परराज्यातील आलेल्या शिकाऱ्यांवर पाचोरा वनविभागाकडून छुपी कारवाई.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२३
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे हे फक्त नावालाच दिसत असल्याचे चित्र मागील तीन महिन्यांपासून दिसून येत आहे. कारण पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील शेतशिवारात तसेच राखीव जंगलात विरप्पनच्या पिल्लावळीने राजाश्रय व वनविभागाचे अर्थपूर्ण संबंध जोपासत दिवसाढवळ्या रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात हिरव्यागार वृक्षांची कत्तल केली आहे. याबद्दल जेव्हा, जेव्हा प्रसारमाध्यमांनी वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा, तेव्हा वनविभागाच्या लबाड लांडग्यांनी प्रसारमाध्यमांना खोट ठरवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला मात्र जेव्हा चित्रफीत बनवून शेंदुर्णी येथील उघड्यावर पडलेल्या शेकडो टन लाकुड साठ्याचे पुराव्यानिशी वृत्तांकन जनतेसमोर आणले तेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी थातुरमातुर म्हणजे (खोदा पहाड, निकला चुवॉं) अशी कारवाई करत स्वताची पाठ थोपटून घेतली व या कारवाईबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही माहिती दिली नाही.
असाच एका छुप्या कारवाईची मोहीती सत्यजित न्यूज कडे प्राप्त झाली असून मागील दोन दिवसांपूर्वी परराज्यातील काही आदिवासींना चारचाकी वाहनांसह, लाठ्या, काठ्या, भाले, तीर कामठे व वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लागणाऱ्या इतर साहित्यासह वनविभागाकडून वन्य प्राण्यांची शिकार करत असल्याच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विशेष यांना काल वैद्यकीय तपासणी पाचोरा येथील नगरपरिषदेच्या दवाखान्यात आणण्यात आले होते. तेव्हा काही सुज्ञ नागरिकांनी त्यांची छायाचित्रे व चित्रफिती काढून अधिक विचारपूस केली तेव्हा त्यांनी भितीपोटी कोणतीही माहिती दिली नसल्याचे सांगितले जाते.
पाचोरा, भडगाव व जामनेर तालुक्यातील वनविभागाच्या जंगलात तसेच शेतशिवारात आलेल्या रानडुक्कर, नीलगाय, ससे यांची दिवसाढवळ्या शिकार करणारे आदिवासी नव्हे तर काही आपल्याच परिसरातील शिकारी आजही दररोज शिकार करुन मांस विक्री करुन हजारो रुपये कमाई करत आहेत. मात्र या विषयाकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पाहिजे तेवढे लक्ष देत नसल्याने या शिकाऱ्यांची हिंमत वाढली असून आता त्यांनी (वाघुर) म्हणजे वन्य प्राण्यांना अडकविण्यासाठी लागणारे जाळे विकत घेऊन ते आता हरणांची शिकार करण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून आतातरी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या शिकाऱ्यांचा व विरप्पनच्या पिल्लावळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी निसर्गप्रेमींनी केली आहे.
हे ऐकुन चोवीस संशयित शिकारी रानडुकरे व इतर वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी आलेले होते असे खात्रीलायक वृत्त असून याबाबत मात्र संबंधित विभागाने अद्यापपर्यंत प्रसारमाध्यमांना कोणतीही अधिकृत माहिती दिली नसल्याने खरा प्रकार काय आहे याबाबत जनमानसातून उलटसुलट चर्चा सुरु आहे.