राज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे देशाचा जी. डी. पी. सावरला जातो त्यांच्या डीपीच कनेक्शन तोडू नका. संतोष पाटील.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/११/२०२२
राज्यकर्त्यांनो हरामी पणा करू नका ज्यांच्या मुळे देशाचा जी.डी.पी. सावरला जातो त्यांच्या डीपीच कनेक्शन तोडू नका. संतोष पाटील.
………………………………………………………..
देश प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलेला असतांना फक्त आणि फक्त शेती उद्योगाने देशाचा जी डी पी सावरलेला आहे हे विसरता कामा नये, मात्र या नमक हराम राज्यकर्त्यांनी शेतकरी आणि शेतीला दुय्यम स्थान दिलेले आहे. महाराष्ट्रामध्ये उद्योग व्यवसायांना, साखर कारखान्यांना पुनर्जीवन देण्यासाठी कारखान्यांचे कर्ज माफ करण्यात आले, मुबलक प्रमाणात वीजपुरवठा करण्यात आला, मात्र सतत तोट्यात असणारा जीवाला घोर लावणारा भाकरीच झाड लावणारा शेतकरी व शेती व्यवसाय दुर्लक्षित करून शेतकऱ्यावर अन्याय करण्यात आला.
सरकार कोणाचेही असो अन्याय फक्त शेतकऱ्यावर होतो हे नवीन नाही फक्त निवडून येण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिल माफ करू, दिवसा चांगल्या प्रकारे वीज देऊ त्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे सांगणारे हे राजकारणी लोक निवडून आल्यानंतर ऐन तोंडी आलेला घास हिसकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता कुठे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून शेतकरी सावरून रब्बीची तयारी करत आहे. काही शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्या करून टाकल्या आहेत त्या कोंब आलेल्या जमिनी पाण्यासाठी गुंतून पडलेले आहेत. दोन-तीन दिवसात पाणी मिळाले नाही तर ते कोंब जळून जातील व शेतकऱ्याचं अधिकच नुकसान होईल त्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे.
पाणी देण्यासाठी लागणारं साधन इलेक्ट्रिक मोटार डी.पी. वरचे कनेक्शन कट केल्याने बंद आहे शेतकरी अतिशय बिकट परिस्थितीमध्ये असतांना हे गेंड्याच्या जातीच सरकारने अतिशय किळसवाणा प्रकार सुरू केला आहे. विद्युत कायदा २००३ कलम ५६ प्रमाणे शेतकऱ्यांना नोटीस न देता त्यांचे विद्युत कनेक्शन कट करण्यात येत आहे. आता शेतीसाठी अतिशय संवेदनशील काळ असून दोन चार दिवसांमध्ये शेतीला पाणी मिळालं नाही तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे.
विद्युत पुरवठा सुरु राहीला असता तर कर्जबाजारी झालेला शेतकरी रब्बीच उत्पन्न घेऊन थोडाफार सावरला असता मात्र तेही या सरकारातील लोकांना सहन झालं नाही. हे शेतकरी विरोधी आहेत होते आणि राहतील राष्टीयअन्न सुरक्षा आयोगाने (National food Security Commission) शेतकऱ्यांचे विद्युत कनेक्शन बंद करु नये असा आदेश पारित केलेला असतांनाही हे कनेक्शन कट करत आहेत, जर आता यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पुन्हा जोडून सुरळीत केले नाही तर शेतकरी त्यांना हजार होल्टेजचा धक्का दिल्याशिवाय राहणार नाही.
संतोष पाटील
७६६६४४७११२