गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या विद्यार्थ्यांची विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत चमकदार कामगिरी.
प्रा. योगिता चौधरी.(शेंदुर्णी)
दिनांक~१४/११/२०२२
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या वतीने आयोजित अविष्कार संशोधन स्पर्धेत शेंदुर्णी येथील गरुड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून पुन्हा एकदा अविष्कार स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे.
मुलजी जेठा महाविद्यालय, जळगाव येथे आयोजित जिल्हास्तरीय अविष्कार स्पर्धेत महाविद्यालयाच्या एकूण १५ संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी सात संघांची निवड विद्यापीठ स्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी झाली होती. विद्यापीठात प्रथम दिवशी झालेल्या पोस्टर सादरीकरणात एकूण पाच संघ हे दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पीपीटी सादरीकरणासाठी निवडले गेले होते. त्यापैकीच तीन संघांना पारितोषिके प्राप्त झाली. त्यात ह्यूमेनिटी लैंग्वेजेस अँड फाईन आर्टस या गटात युजी कॅटेगिरी मध्ये कु. वैष्णवी खाकरे आणि कु. रंजना कुमावत या विद्यार्थिनींना प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.
याच गटात पीजी कॅटेगिरी मध्ये राहुल पाटील या विद्यार्थ्यास प्रथम पारितोषिक प्राप्त झाले. कॉमर्स मॅनेजमेंट आणि लॉ या विषयातील पीजी गटात शिवराज बारी या विद्यार्थ्याला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले.या विद्यार्थ्यांच्या चमकदार कामगिरीमुळे महाविद्यालयाने पुन्हा एकदा स्पर्धेतील आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. वरील तीनही संघ हे राज्यस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेसाठी निवडले गेलेले आहेत. स्पर्धेमध्ये इतरही विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण खूप सुंदर केले. त्यात महेंद्र घोंगडे , नम्रता चौधरी , पल्लवी पाटील,प्रतीक बोरसे,गायत्री पाटील, योगिता शिंपी, शुभांगी बारी या विद्यार्थ्यांनी ही पोस्टर आणि मॉडेल स्वरूपात आपले विषय सादर केले. स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा. डॉ. योगिता चौधरी यांनी जबाबदारी सांभाळली.
संघ व्यवस्थापक म्हणून प्रा. डॉ. अजिनाथ जिवरग आणि प्रा.डॉ.दिनेश पाटील यांनी कार्य केले. राज्यस्तरासाठी निवड झालेल्या या तीनही संघांच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन आणि कौतुक अध्यक्ष श्री संजयदादा गरुड, सचिव श्री. सतीशजी काशीद, संचालिका सौ.उज्वलाताई काशीद, सहसचिव श्री. दीपक गरुड, वस्तीगृह सचिव श्री.कैलास देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील, उपप्राचार्य ,प्राध्यापक शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. महाविद्यालयाने परिवारातर्फे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या सर्वच विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.