आमदार साहेब,धार्मिक उत्सवात अधिक खर्च न करता,वास्तविक शाश्वत प्रश्नांवर काम केलं असतं तर तालुक्यातील जनतेन तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. (संतोष पाटील.)
आमदार साहेब,धार्मिक उत्सवात अधिक खर्च न करता,वास्तविक शाश्वत प्रश्नांवर काम केलं असतं तर तालुक्यातील जनतेन तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं. (संतोष पाटील.)
____________________________________________
दहीहंडी, गणपती, दुर्गा उत्सव
खर्चिक मिळावे यावर अधिक खर्च न करता जर शेतकऱ्यांच्या विद्युत डी. पी. (ट्रान्सफॉर्मर) चे वायरिंग व्यवस्थित करून विद्युत पुरवठा सुरळीत केला असता तर या तालुक्यातील जनतेने आपल्याला डोक्यावर घेतले असते. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी आपण, आपला गट ,आपले सरकार, या लोकांना वास्तविक मूलभूत प्रश्नाबद्दल काहीच घेणं देणं नाही. ग्रामीण भागातील साधा भोळा कार्यकर्ता आपल्या ह्या अशा वेगळ्या कारस्थानाला बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेत आहे, *मी कुठल्याही राजकीय पक्षाचा संघटनेचा कार्यकर्ता नाही,* मी फक्त दीनदुबळ्या गरीब शेतकऱ्यांना पडलेल्या प्रश्नावर बोलतो, हे प्रश्न इतके अवघड आणि जटिल झाले आहेत कुठलेही सरकार आलं तरी ते प्रश्न सुटत नाहीत. तुमचं असो किंवा विरोधकांचं आपल्यासारख्या धुरंदर राजकारण्यांना सगळं कळतं शेतकरी विरोधी ध्येय, धोरण, हवामान, पिक विमा, शेतीसाठी लागणारे बियाणं, रसायन, यामध्ये होणारी भेसळ शेतकऱ्याला APMC
(Agriculture Produces Market Committee ) मध्ये लुटलं जाणं खाजगी व्यापाऱ्याकडून त्याची लूट होणं अशा बऱ्याच गोष्टी आपणास कळतात, मात्र अशा शाश्वत गोष्टींवर सरकार काम करत नाही आणि ज्या सरकारला आमदाराला *वास्तविक शाश्वत प्रश्नांची जाण नसते त्यांच्याकडून काय अपेक्षा*. आताच जिवंत उदाहरण घ्यायचं तर एसटी बस गाव खेड्यापर्यंत विद्यार्थ्यांना घ्यायला वेळेवर येत नाही, आणि मेळाव्यासाठी या सणासुदाच्या दिवसात कशा मिळतात हे सर्व सहन न होण्याच्या पलीकडचं म्हणून हा शब्द प्रपंच. दुसरी गोष्ट आपल्या तालुक्यामध्ये अचानक पावसाने दांडी मारली बरड मातीची शेती उध्वस्त होऊ पाहतेय विहिरींना थोड थोड पाणी आहे मात्र प्रत्येक डीपीवर बिकट अवस्था झाली आहे वायरिंग व्यवस्थित नाही कुठे लगेच फॉल्ट होऊन लाईट बंद पडते, समधीत अधिकारी ऐकून घेत नाही, आपण आधीच्या सरकारमध्ये होतात आताच्या सरकार मध्ये आहात, आधीच सरकार ना करते होतं मग ह्या सरकारनं ठोस निर्णय घेऊन काही प्रश्न सोडवले पाहिजे, आपल्या तालुक्यामध्ये आरोग्याचे, (माणसांच्या व गुरांच्या) शिक्षणाचे ,शेतीचे रस्त्यांचे अनेक प्रश्न आहेत काम करायला खूप वाव आहे मात्र आपणास एकही प्रश्न दिसत नाहीत, ग्रामीण भागातील तरुण शेतकरी आपला कार्यकर्ता आहे आपल्या एका हाकेवर जीव द्यायला तयार आहे, मात्र दुर्दैव असं की आपणास ते दिसत नाही एक शेतकरी या नात्याने आपणास विनंती करतो तालुक्यामध्ये खूप मोठे प्रश्न आहेत आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा निव्वळ धार्मिक उत्सव साजरे करून तालुक्यातील जनतेचे भलं करता येत नाही, खरा विठ्ठल बांधावर मरतोय,शेतकरी जळणारे पीक पाहून हवालदिल होतोय आणि आपण दहीहंडी, गणपती, दांडीया आणि पैठणी, मेळावे ,या गोष्टींमध्ये दंग आहात आमदार साहेब चूक आपली नाही *आपल्या बापाच्या मारेकऱ्यांचे झेंडे घेऊन फिरणारे हे शेतकऱ्यांचे पोरच* *या गोष्टीला कारणीभूत आहे* या लेकरांना कुठली धुंदी चढली आहे हे कळत नाही, आपला शेतकरी बाणा ही पोरं विसरून चालले आहेत हीच मोठी शोकांतिका आहे….
संतोष पाटील
7666447112