बघा पटतंय का ? पटत असेल तर विचार करा, नसेल पटत सोडून द्या. संतोष पाटील
दिनांक~१३/०७/२०२३
*बघा पटतंय का?*
*पटत असेल तर विचार करा*
*नसेल पटत सोडून द्या*
संतोष पाटील
————————————————-
अनादि अनंत काळापासून या भारतभूमीवर असे पेच प्रसंग बऱ्याच वेळेस निर्माण झालेले आहेत, महाभारतात राजा (कृष्ण) एकीकडे आणि सैन्य दुसरीकडे अशी अवस्था असतांना विजय कुणाचा झाला आहे हे सर्वश्रुत आहे. राजकारणात आणि प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात, मात्र युद्धाचे काही नियम असतात. काही सूत्र असतात. त्याप्रमाणे युद्धनीती ठरते. न्याय्य पद्धतीने लढून पूर्वी धर्म युद्ध जिंकले जायचे आताच्या काळात ही राजकारणी लोक कुठल्याही पद्धतीचे सूत्र नियम पाळत नाहीत, जिंकण्याच्या लालसेने सत्तेच्या लोभापायी या पवित्र अशा भारतभूमीवर ही राक्षस वृत्तीची लोक नैतिकता गुंडाळून ठेवून राजकारण करताहेत.
खरे म्हणजे या लोकांना राजकारणाचा अर्थही कळत नाही, रामायण-महाभारत, छत्रपती शिवाजी महाराजांचा श्रीमंत इतिहास या सर्व गोष्टी हे लोक विसरून गेले आहेत. कुणी रामाच्या नावाने तर कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतांचा जोगवा मागून निवडून येतात सत्ता काबीज करतात, आणि नंतर आपण समाजाच या देशाच या राज्याच कही देन लागतो हे विसरून जातात, सद्यस्थितीत महाराष्ट्रात जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे त्या गोष्टीला कारण असेल तर तो या राज्यातील या देशातील सामान्य माणूस मतदार हेच कारणीभूत आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आपला नेता कसाही वागला तरी चालेल मात्र त्याने आपल्या सोबत एक सेल्फी काढावा, आपल्या घरी लग्नामध्ये येऊन नाचाव, इतकीच माफक अपेक्षा या सामान्य माणसाची असल्याने या धूर्त पुढाऱ्यांनी या मतदारांची गरिबांची नाडी बरोबर ओळखलेली आहे. या मध्यमवर्गीय लोकांना विकास नकोय विकासाच्या फक्त गोष्टी पाहिजे यांना सुख सुविधा नकोय यांना फक्त देवधर्म या गोष्टींमध्ये गुंतवून धार्मिक कार्यात वर्गणी देऊन मंदिर बांधली जाताय तर दुसरीकडे गोरगरिबांची मुल शिकतील मोठी मोतील शिकुन सवरुन कुठेतरी नोकरीला लागतील अशी ज्ञानदानाची विद्यामंदिर ओस पडत असल्याने खाजगी शाळा, विद्यालयात वारेमाप फी भरून शिक्षण घेता येत नसल्याने गोरगरिबांची मुल, मुली दिशाहीन होत आहेत. असे असले तरी आपल्याला वरातीत नाचणारा आमदार हवा आहे.
मूठभर लाभार्थी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन गावगुंडांची फळीच्या फळी निर्माण करून संपूर्ण गावात तालुक्यात दहशत निर्माण करणारे हे आमदार खासदार या देशाचं वाटोळं करताहेत जनतेची सेवा करण्यासाठी निवडून द्या म्हणणारा आमदार दरवर्षी कोट्यवधीची मालमत्ता आपल्या घशात घालतो आहे. या देशाचं सकल उत्पन्न विकास कामांवर जेवढं खर्च होत आहे त्याच्या दुप्पट आमदार खासदारांच्या गाडी बंगले फोन पगार या सर्व गोष्टीं वर खर्च होत आहे. गेल्या दहा वर्षात देशात महाराष्ट्रात किंवा कुठल्या राज्यात एकही मोठा प्रकल्प आलेला नाही. किंवा जलसिंचनाचे प्रश्न सुटलेला नाहीत. तरुणांना नोकऱ्या नाहीत छोटे, मोठे उद्योग व्यवसाय बंद पडलेत, महागाईचा राक्षस प्रचंड धुमाकूळ घालतोय शेजारी देश आपल्या देशावर टपून बसले आहेत रुपया घसरतोय देश कर्जाच्या खाईत लोटला जातोय, इथला तरुण शिलदार व्यसनाधीन होऊन आत्महत्येचा मार्ग निवडत असुन शेतकऱ्याची तरणीबांड पोर झाडाला लटकताना दिसत आहेत.
एकूणच हा देश विनाशाच्या दिशेने चालला आहे. विनाशाच्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. या देशातील विचारवंत, निष्ठावंत, साहित्यिक, पत्रकार ,संपादक, टीकाकार, राजकीय विश्लेषक, या सर्वांनी आपले ओठ शिवले आहेत फक्त ते पोट भरत आहेत, या अशा जीवघेण्या परिस्थितीमध्ये देशाला महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी दुसर्या स्वातंत्र्याची पहिली लढाई जिंकण्यासाठी सर्व देशवासियांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे.
संतोष पाटील
७६६६४५७११२