सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • स्वताचे घर वाऱ्यावर सोडून जनतेसाठी धाऊन येणाऱ्या महसूल, वीज वितरण व नगरपालिका यंत्रणेचा भावनिक सत्कार.

  • सत्यजित न्यूजच्या वृत्ताची दखल घेऊन लोहारी बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुळजाई शिक्षण मंडळाला नोटीस.

  • पाचोरा येथील माहेरवाशीण महिला डॉक्टरचा अपघाती मृत्यू, लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न भंगले.

  • शौचालयाचा शोषखड्डा फुटल्याने गल्लीत दुर्गंधी, ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष. भाग १

  • गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपी एकनाथ पाटील पाचोरा पोलीसांच्या रडारवर, अजून काही गुटखा विक्रेत्यांची नावे समोर येण्याची शक्यता.

महाराष्ट्र
Home›महाराष्ट्र›पोलिस कर्मचाऱ्यांवर अन्याय का ? श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

पोलिस कर्मचाऱ्यांवर अन्याय का ? श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

By Satyajeet News
May 10, 2022
218
0
Share:
Post Views: 138
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

पोलिस कर्मचाऱ्यांवर अन्याय का ? श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

काही दिवसांपूर्वी नागपूरच्या वाहतुक शाखेतील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने कर्तव्य बजावतांना संसारासाठी वेळ मिळत नसल्याची तक्रार केली त्या महिलेने थेट पोलीस महासंचालकांकडे ही कैफियत मांडली तेव्हा महिला पोलिसांना फक्त आठ तासांची ड्युटी ठेवल्याचे आदेश काढण्यात आले‌. त्याबाबत केवळ नागपूर आणि औरंगाबाद पोलिसांत अंमलबजावणी सुरू झाली.

हीच तक्रार पुरुष अधिकाऱ्यांची ही आहे देशाच्या सीमा सुरक्षेसाठी तीन्ही सैन्यदलाचे जवान कर्तव्य बजावत असतात राज्य अंतर्गत सुरक्षेसाठी पोलीस दल हेच कार्य करत असते. देश स्वतंत्र झाल्यापासून पोलिसांना किमान बारा तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. काही कामकाजासाठी २४ तासही कर्मचारी कर्तव्यावर हजर असतात. त्यांच्या कामाचे नियोजन स्वातंत्र्यानंतर आज तागायत झालेले नाही.

दिवस पाळी असल्यास सकाळी नऊपासून ड्युटीवर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची रात्रीही घरी येण्याची वेळ निश्चित नसते. रात्रपाळी वर असलेल्यांची ही हीच स्थिती असते दरम्यान १२ तासांपेक्षा किमान तीन-चार तास अतिरिक्त वेळ पोलीस नेहमीच कामांवर असतात. त्यांना या कामांचा कोणताही ओव्हर टाईम मिळत नाही. गुन्हेशोध आणि कार्यालयीन कामामुळे वाढलेल्या तणाव व बंदोबस्तामुळे थकलेला पोलीस कर्मचारी घरी गेल्यावर कुटुंबीयांशी संवाद साधेलच असेही नसते. प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरातील हा नेहमीचा येथे प्रसंग आहे.

त्यामुळे पोलिसांना आठ तासांची ड्युटी देण्याची मागणी वेळोवेळी होत आहे त्याकडे सरकार आणि राजकीय मंडळी सोईने दुर्लक्ष करीत आहे गृह खात्याच्या मागण्या आणि समस्या निवारण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. हेच दुर्दैव नोकरीच्या पहिल्या दिवसापासून ते निवृत्तीपर्यंत पोलीस रोज किमान पंधरा तास कर्तव्यावर हजर असतो. त्यावेळी गुन्हे नोंद तपास कार्यालयीन जबाबदारी यासह तनाव नियंत्रण सण, उत्सव आणि व्ही. आय. पी. बंदोबस्त निवडणूक यासह इतर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पोलिसांवर असते अर्थात हा पोलिसांच्या कर्तव्याचा भाग आहेच पण तणाव मुक्तीसाठी आठवड्यातून फक्त एक दिवस साप्ताहिक सुट्टी असते.

ही सुट्टी ही कित्येकदा रद्द केले जाते. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशी हजर राहुनही त्या कामाचा अतिरिक्त भत्ता किंवा वेतन मिळत नाही कामगार कायद्याप्रमाणे कामाच्या वेळेनंतर चार तास पेक्षा आधिक काम केल्यास आठ तासांचे वेतन देण्याच्या नियम आहे. हा नियम एच. ए. ए. ल. नोट प्रेस इंडियन सेक्युरिटी प्रेस या केंद्र सहकारी सेवेत पाळण्यात येतो. तेथे कर्मचाऱ्यांना ओव्हर टाईम देण्यात येतो. राज्यातल्या सामान्य पासून मंत्र्यांपर्यंत सर्वांच्या सुरक्षासह सौख्यासाठी कार्यरत पोलिसांना कोणताही लाभ मिळत नाही. हीच खंत पोलीस दलाच्या जिव्हारी लागत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार १२ तासांपेक्षा अधिक वेळ कर्तव्यावर हजर असल्यास पोलिसांना दर महिना भत्ता देण्याचा निर्णय झाला त्यानुसार अंमलदारांना तेराशे रुपये आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना पंधराशे रुपये देण्याची तरतूद आहे.

म्हणजे चार तास अतिरिक्त काम केल्यास अंमलदारांना ३४ ते ४३ आणि उपनिरीक्षकांना पन्नास रुपये मिळतात वेतन बिले पाठवल्यावर मंजुरी मिळाल्यानंतर ही खात्यात जमा होण्यास किती अवधी लागेल हे निश्चित नसते. शिवाय इतका तुटपुंजा निधी देणे ही पोलिसांची निवळ छळवणूक आणि थट्टा आहे. पोलिसांना आठ तास काम द्यायचे असल्यास मनुष्यबळ वाढवावे लागेल. त्यासाठी पोलीस भरती होणे अपेक्षित आहे. अनेक पोलीस आयुक्तालयात पदे रिक्त असून अनुकंपाधारक ही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. कामगार कायद्यानुसार अतिरिक्त वेळ काम अपवादाने होणे अपेक्षित आहेत.

पोलिसांना मात्र नियमित चार तास अतिरिक्त कर्तव्य बजवावी लागते. परिणामी अवेळी जेवणामुळे मानसिक ताण आणि नैराश्य बळावते. दिनचर्येत सातत्याने बदल होत असल्याने व्यायामाचा ही आभाव असतो. त्यामुळे उच्च रक्तदाब मधुमेहा सह इतर व्याधी कर्मचाऱ्यांना जडतात परिणामी निवृत्तीपर्यंत पोलीस कर्मचारी अनेक आजारांनी ग्रासलेले असतात. अथवा सेवेत असतांनाच त्यांचा मृत्यू होतो. असे असले तरी पोलिसांच्या ड्युटी नियोजनात सह वैद्यकीय सुरक्षेबाबत गांभीर्याने विचार होत नाही.

पोलीस निवृत्त झाल्यावर सरकारी निवासस्थान रिकामे करण्याचे आदेश मिळतात‌‌. सेवेत असता़ना स्वतःचे घर खरेदी केले नसेल तर अनेक पोलिसांना निवृत्तीनंतर घरासाठी शोधा, शोध करावी लागते‌. सरकार परराज्यातून आलेल्यांना नागरिकांना घर बांधून देते मात्र पोलिसांना अशी सुविधा मिळत नाही. निवृत्ती वेतन लागू करण्यासाठीही काही वेळ लागतो. यासह निवृत्तीनंतर सेवेतील सर्व लाभ काढून घेतले जातात. सेवेत असतांना गुन्ह्याची उकल केल्यानंतरचा पाठपुरावा मात्र निवृत्ती काळातही सुरू असतो. न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी साक्ष देण्यासाठी अंमलदार अधिकाऱ्यांना वेळोवेळी जावे लागते‌. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांच्यातील पोलीस कायम असतो राज्य पोलीस दलातून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांना सेवेत असतांना कायमस्वरूपी कामाच्या भारामुळे कुटुंबांकडे अजिबात लक्ष देता येत नाही.

त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर पोलिसांना आर्थिक, आरोग्य व सामाजिक पातळीवर विविध समस्यांचा सामना करावा लागतो. नेमक्या त्याच वेळी सेवा काळातील सवलती बंद होतात‌. पोलीस सेवेत असतांना आरोग्य सुविधा मिळतात‌. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण आरोग्य योजना लागू आहे‌. या योजनेतून पोलीस अधिकारी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियातील सदस्य यांच्या गंभीर आजारांवर कँशलेस उपचार केले जातात या योजनेत २७ आकस्मिक व पाच गंभीर आजारांचा समावेश आहे. हृदय शस्त्रक्रिया, रक्तानचा कर्करोग, आधी आजारांवर उपचार केले जातात. निवृत्तीनंतर या वैद्यकीय मदतीची खरी गरज असते नेमके या कुटुंब आरोग्य योजनेचा लाभ निवृत्तीनंतर मिळत नाही. सैन्यदलातील प्रत्येकाला निवृत्तीनंतरही सर्व सुविधा दिल्या जातात. मग पोलिसांवरच अन्याय का ? हा प्रश्न कित्येक वर्षांपासून विचारला जात आहे.

सध्या पोलिसांना आठ तासाची ड्युटी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महिलांसह पुरुष अंमलदार अधिकाऱ्यांनाही हा नियम लागू होणे गरजेचे आहे. यासह पोलिसांना ओव्हर टाईम भत्ता मिळाल्यास त्यांचे मनोबल वाढेल आरोग्य योजनेचा लाभ सेवानिवृत्त पोलीस पती-पत्नी या दोघांना मिळावा यासाठीही निर्णय होण्याची गरज आहे. त्या संदर्भात महासंचालक कार्यालयाने प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगितले होते. त्यासाठी सरकार दरबारी योग्य निर्णय होणे अपेक्षित आहे ३० ते ४० वर्ष पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर निवृत्तीनंतरचा काळ कर्मचारी अधिकाऱ्यांना आरोग्यदृष्ट्या सुखद जगता येईल हीच अपेक्षा
श्री. जी. एम भगत. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पाचोरा पुरवठा विभागात दलालांचा उच्छाद व धान्य ...

Next Article

शेंदुर्णीत शहर सहकारी विक्री संघाच्या जिनिंग प्रेस ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • महाराष्ट्र

    *चौफेर व्यक्तिमत्वाचे उभरते नेतृत्व !- प्रवीण ब्राह्मणे*

    July 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    मालखेडा येथील सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्रावर ग्रेडरची मनमानी. कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी.

    December 1, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    किशोर पाटील कुंझरकर यांची राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड. खान्देश ला मिळाला पहिल्यांदा बहुमान.

    November 23, 2020
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    एसटीच्या खाजगीकरणाबाबत सरकारकडून चाचपणी सुरू एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा ; कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी ५०० कोटी वितरित.

    November 20, 2021
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    पाचोरा येथील शकील शेख सह जळगाव जिल्ह्यातील ११ जणांना पोलीस महासंचालक पदक जाहीर.

    April 26, 2024
    By Satyajeet News
  • महाराष्ट्र

    व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ भारतात सहीष्णा सोमवंशी ठरली पाचोऱ्यातील पहीली कन्या.

    January 27, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    लोहारी येथील दत्त माध्यमिक विद्यालयाच्या गलथान कारभाराची थेट मा. मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

  • ब्रेकिंग न्यूज

    स्वराज्य पक्षाच्या उमेदवारालाच पडला श्री. छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर.

  • पाचोरा तालुका.

    पाचोरा नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे लाखो लिटर पाणी गटारीत, काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज