शेंदुर्णी येथील डॉ. सागर दादा गरुड यांच्या घरातून चोरी दोन लाखाचा ऐवज लंपास. (घराला कुलूप असल्याचे पाहून चोरट्यांनी साधला डाव.)
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२२
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील अहिल्याबाई होळकर चौकात डॉ.मा.श्री. सागर गरुड यांचे घर आहे. या घराला कुलुप असल्याचे पाहून घरी कोणीही नसल्याची खात्री झाल्यावर चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधला व घरात घुसून कपाटातील ५००००/०० रुपये रोख रक्कम व चार तोळे सोने चोरुन नेल्याची घटना घडली असून शेंदुर्णी गावातील या चोरीच्या घटनेबाबत नागरिकांनी भिती व्यक्त केली असून रात्रीच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्याबाई होळकर चौकात रहात असलेले डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांचे घरी आई-वडील व सगळी मंडळी मागील चार पाच दिवसापासून पाचोरा गेलेले होते. घरी कोणीही नसल्याने त्यांनी घराला कुलूप लावले होते. या निर्मनुष्य घरावर पाळत ठेवत चोरट्यांनी मध्यरात्री घराच्या मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. व वरच्या बेडरूम मध्ये असलेल्या कपाटात असलेले चार तोळे सोने व ५००००/०० रुपये रोख रक्कम चोरुन नेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी डॉ. मा.श्री.सागर दादा गरुड व परिवार घरी आल्यानंतर हा चोरीचा प्रकार लक्षात येताच त्यांनी लगेचच पहूर पोलिसांना कळविले. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थीतीची पहाणी केली. व चोरी झालेल्या भागात कोणीही हात लावू नये अशी सुचना दिली. लगेचच जळगाव येथून श्वानपथक व फिंगर प्रिंट तज्ञ यांच्या पथकाला पाचारण करुन कपाटावरील व इतर ठिकाणचे ठसे घेण्यात आले असून श्वान पथकाने पाचोरा नाक्यापर्यंत रस्ता दाखविला असल्याने चोरटे पुढे कदाचित वाहनातून निघून गेले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या चोरीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस अधिकारी मा.श्री. शिंदे करीत आहेत.
(चोरीची घटना एक मात्र तर्कवितर्क अनेक)
चोरीची घटना घडल्यापासून शेंदुर्णी नगरीत जनमानसातून अनेक तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. कारण आता शेंदुर्णी नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून या निवडणुकीत डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांचे नाव प्रथम क्रमांकावर घेतले जात आहे. कारणही तसेच आहे. डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड म्हणजे आज शेंदुर्णी नगरीतील एक सच्चा समाजसेवक, सज्जनांचे मित्र तर लबाडांचे कर्दनकाळ ठरत असून ते वैद्यकीय व्यवसायातून सर्वसामान्य जनता व गोरगरीब रुग्णांसाठी ते एक देवदूत ठरत असल्याने त्यांना मुद्दामहून त्रास देण्याच्या हेतूने हा चोरीचा प्रकार घडवून आणला असावा असा अंदाज डॉ. मा.श्री. सागर दादा गरुड यांनी व्यक्त केला आहे.
कारण चोरी करणारे चोरटे जर फक्त आणि फक्त चोरीचा उद्देश ठेवून चोरी करण्यासाठी घरात घुसले असते तर त्यांनी घरातील रोख रक्कम व दागदागिने चोरुन नेतांना मात्र घराच्या देव्हाऱ्यातील चांदीच्या (मौल्यवान) असलेल्या देवांच्या मुर्त्याही चोरुन नेल्या असत्या मात्र तसा काही प्रकार घडला नसून चांदीच्या देवांच्या मौल्यवान मुर्त्यांंना हातही लावलेला नसल्याने मला फक्त त्रास देण्यासाठी हा प्रकार घडला असावा अशी शंका उपस्थित केली आहे.