शिंदाड कापूस चोरी प्रकरणातील म्होरक्या व कापूस विकत घेणारे व्यापारी मोकाटच.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०२/२०२३
पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावात पाच शेतकऱ्यांच्या प्लॉट, पत्र्याच्या शेडमध्ये व घरात ठेवलेल्या कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली असून दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी पिंपळगांव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२३ भादवि कलम ४६१ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फिर्यादीवरून जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, चाळीसगाव परिमंडळचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश चोपडे साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी भाग पाचोराचे मा. श्री. अभयसिंग देशमुख साहेब, पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार, सहाय्यक फौजदार मा. श्री. रामकृष्ण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जितेंद्र पाटील, श्री. मुकेश लोकरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. रणजित पाटील पोलिस नाईक श्री. शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक श्री. अरुण राजपूत, श्री. दिपकसिंग पाटील, श्री. अभिजित निकम, श्री. प्रशांत पाटील, अमोल पाटील, संदिप राजपूत, यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन संशयीत आरोपी समीर जलाल तडवी, वय- १९ वर्षे, शकील मुश्ताक तडवी, वय २२ वर्षे, अफसर दगडु तडवी, वय १९ वर्षे, ईमान सलीम तडवी, वय २६ वर्षे, शकील बिस्मिल्ला तडवी, वय ३१ वर्षे, विनोद कचरु तडवी वय ३६ वर्षे, रहीम मुश्ताक तडवी, वय २३ वर्षे, अनिल दिलावर तडवी, वय- २५ वर्षे, अस्लम हुसैन तडवी, वय २१ वर्षे, सर्व रा. शिंदाड, ता. पाचोरा यांचा लागलीच शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यांच्या तपासासाठी अटक केली होती परंतु सर्वच्या, सर्व संशयित आरोपींना पोलिस कस्टडी न मिळाल्याने तपासात व्यत्यय आला आहे.
विशेष म्हणजे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींना पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी विचारपूस केली असता गुन्हा कबूल करत त्यांनी चोरलेल्या कापसाचे गाठोडे त्यांच्या सोबत चोरी प्रकरणात सामिल असलेल्या व चोरी करण्यापासून तर कापूस व्यापाऱ्यांशी संधान साधून कापूस विक्री करण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या एका चोरट्यांच्या शेतातून हा चोरीला गेलेला कापूस जप्त करण्यात आला असला तरी संबंधित कापूस चोरी पासून तर विक्री करेपर्यंत महत्वाची भूमिका बजावणार कथीत शेतकरी मात्र मोकाटच असल्याने हे तिघे या चोरट्यांना सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. मात्र चोरट्यांना मदत गरणारा हा भामटा व चोरीचा कापूस घेणारे प्रतिष्ठित व्यापारी यांना ताब्यात घेऊन अधिक तपास केल्यावर बरेचसे चोरीचे गुन्हे उघडकीस येतील अशी जनमानसातून खमंग चर्चा केली जात आहे.