सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संस्था चालकाकडून जिल्हापरिषदेला साडे नऊ लाखाचा चुना.

  • लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शिक्षण संस्था, संबंधित विभागाकडून चौकशीचे आदेश.

  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

Uncategorizedआपलं जळगाव
Home›कृषी विषयक›Uncategorized›तो आला म्हणजे ती जाते, ग्रामीण भागातील जनता हैराण.

तो आला म्हणजे ती जाते, ग्रामीण भागातील जनता हैराण.

By Satyajeet News
June 17, 2021
907
0
Share:
Post Views: 50
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०६/२०२१

पावसाळ्याचे दिवसात विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरु रहावा म्हणून विद्यूत वितरण कंपनीकडून पावसाळा सुरु होण्याआधी पावर हाऊस पासून तर गावागावातील व शेत शिवारातील विद्यूत तारांच्या व खांबाच्या आसपास असलेल्या झाडांची व्यवस्थित छाटणी (ट्रि कटिंग) करण्यासाठी काही विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी व काही मजूर लाउन तासंतास विद्यूत पुरवठा खंडित ठेवत (ट्रि कटींग) झाडेझुडपे तोडली तसेच इतरही बिघाड दुरुस्ती केली. याकरिता भरपूर प्रमाणात खर्चही केला गेला आहे.

परंतु आता नुकताच पावसाळा सुरू झाला असून जेमतेम चार थेंब पडले तरी ग्रामीण भागातील गावागावातून विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले या कारणास्तव ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे परिस्थिती लक्षात घेता कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पावसाळ्याच्या अगोदर केलेली कामे खरोखरच काळजीपूर्वक केली आहे किंवा नाही याबद्दल संशय निर्माण होतो.

याबाबत सविस्तर वृत्त असे की उन्हाळ्यात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते तसेच कृषिपंपांना देण्यात येणारा विद्युतपुरवठा विद्युत वितरण चे मनमानीपणाने कधी रात्री तर कधी दिवसा कधी कमी दाबाने तर कधी जास्त दाबाने दिला जात होता. तरीही ग्राहकांनी कसेबसे दिवस पास केले.

परंतु आता पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी राजा पावसाचे आगमन झाल्याने आनंदात आहे. परंतु पेरणीच्या दिवसात शेतातून राब राब राबून आलेला शेतकरी घरी आल्यावर मात्र हैरान होत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे दोन थेंब पाऊस पडला तरी वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सतत विद्यूत पुरवठा खंडित होत असल्याने व आता रॉकेल मिळत नसल्याने घराघरातील दिवा, कंदील कालबाह्य झाले आहेत. ऐन संध्याकाळी व रात्री विद्यूत पुरवठा खंडित होत असल्याने अंधारातच स्वयंपाक करावा लागतो. किंवा गोडेतेलाचे दिवे लाऊन वेळ काढावी लागते तसेच गावागावात डासांचा उपद्रव वाढला असून शेतातून दिवसभर काम करुन थकलेल्या शेतकऱ्याला आरामात झोप घेणे मुश्कील झाले आहे. तसेच पिठाच्या गिरण्या वारंवार बंद राहत असल्याने काही कुटुंबांना भाकरीसाठी पीठ नसल्याने एक तर भात खाऊन किंवा उपाशीपोटी झोपावे लागते तसेच पावसाळा सुरु झाल्यामुळे जमिनीतून साप बाहेर येण्याची घटना वाढल्या आहेत रात्री-बेरात्री शेतकऱ्यांना आपल्या गुराढोरांना चारा टाकण्यासाठी जातांना किंवा इतर दैनंदिन कामे पार पाडताना अंधारातच कामे करावी लागतात यामुळे एखाद्यावेळेस विषारी प्राण्यांने चावा घेतल्यास जीवावर बेतू शकते. तसेच पाणीपुरवठा योजना विस्कळीत होत असल्याने शेतातून थकून-भागून आलेल्या शेतकरी कुटुंबाला दैनंदिन कामकाजासाठी लागणारे पाणी आसपासच्या विहिरीवरुन भरावे लागते.

अश्या एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असतांनाच विद्यूत वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयात रहात नसल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाल्यानंतर हातावर हात ठेवून बसावे लागते. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येवर त्वरित तोडगा काढून कायमस्वरूपी विद्यूतपुरवठा कसा देता येईल याकडे लक्ष केंद्रित ग्रामीण भागातील जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

*निधन वार्ता* योगेंद्र इंगळे.

Next Article

मीना समाज महासभा महिला जिल्हाध्यक्षपदी निशाताई महेर ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    सौ. वंदनाताई चौधरी यांच्या प्रयत्नातून, पाचोरा ते कळमसरा बस पुर्ववत सुरु.

    September 27, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या गुरांचे बाजार कोविड-१९ चे नियम पाळून सुरु करा.

    June 3, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले १०१ झाडांचे वृक्षारोपण, सु-लक्ष्मी सेवाभावी संस्थेचा स्तुत्य उपक्रम.

    July 28, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    ग्रामसेवक नियमितपणे मुख्यालयात येत नसल्याने ग्रामस्थ अडचणीत.

    January 29, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedमहाराष्ट्र

    अरुणा प्रकल्पग्रस्तांची , मानवी हक्क आयोगाने घेतली दखल.

    December 25, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorized

    अंगारकी चतुर्थीला वरखेडी बसस्थानक परिसरात उघड्यावर मांस विक्री.

    January 10, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • पाचोरा तालुका.

    भडगाव ते वाक जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाचे भूमिपूजन संपन्न.

  • आपलं जळगाव

    राष्ट्रीय क्रीडा दिन विशेष, खिलाडू वृत्तीमुळेच कोरोना कक्षात बसून’मृत्यू घराचा पहारा’पुस्तक लिहू शकलो ‘मृत्यूकार विनोद अहिरे’

  • पाचोरा तालुका.

    कंबरदुखी, पाठदुखी, अंगदुखीवर उपचार खास, भोजे ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्यावरुन करा प्रवास.

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज