लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतांसाठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा मालाचे वितरण.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०४/२०२१
लोककला राहत कोष ग्राम स्वराज समिती आणि निऋती लोकार्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गरजु लोककलवांतां साठी लोककला राहत कोष मार्फ़त जीवनावश्यक किरणा मालाचे वितरण करण्यात आले.
लोककला राहत कोष चे उद्घाटन सकाळी चाळीसगांव येथे मा. दिलीप चव्हाण(संचालक, साद फाउंडेशन) यांच्या हस्ते झाले. तसेच पाचोरा येथे मा. खलील दादा देशमुख यांच्या हस्ते लाभार्थीना लोककला राहत किट वाटप करण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत चालीसगांव, भड़गाव व पाचोरा या तीन तालुक्यातील विविध लोककला प्रकारातील ९० गरजु लोककलावंतांना या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे.
या कठीण काळात ज्या लोकांची उपजीविका हि केवळ लोककलेवर आधारित आहेत अशा अनेक कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील वर्षभरापासून मुख्य उत्पन्नाचे साधनच जवळ जवळ बंद झाले असून मायबाप सरकार जी काही मदत जाहीर करते त्यात हा संपूर्ण समुदाय नेहमी उपेक्षितच राहतो.
याची दखल घेत ग्राम स्वराज समिती आणि निरुती लोकाआर्त यांच्या संयुक्त विद्यमाने लोककला राहत कोष या उपक्रमाची सुरवात करण्यात आली व या अतंर्गत गरजू लोककलावंतांना महिन्याकाठी लागणारा किराणा मदत म्हणून वाटप करण्यात आला. सद्या चाळीसगाव, भडगाव, पाचोरा या तीन तालुक्यामधील एकूण ९० लोककलावंतांना लोककला राहत कोष या उपक्रमा अंर्तगत मदत करण्यात आली. लाभार्थी निवडतांना पुढील पैकी निकष समोर ठेऊन लाभार्थी निवडण्यात येणार आहेत.
१] सदर लाभार्थी हा भूमिहीन असावा.
२]त्यांची उपजीविका हि लोककला सादरीकरणावर आधारित असावी, अथवा त्यांच्या उत्त्पन्ना चे मुख्य साधन लोककला सादरीकरन हे असावे.
३]जेष्ठ नागरिक असल्यास प्राधान्य.
वरील निकष नुसार एकूण ९० लाभार्थी प्राप्त ठरले असून यांना प्रती लाभार्थी प्रती महिना सरासरी १५०० रुपये इतक्या किमतीचा किराणा माल पुरवण्यात येणार आहे. यात दैनदिन आहारा साठी लागणाऱ्या साहित्याचा अंतर्भाव आहे. यात एक लाभार्थी १५०० रुपये या प्रमाणे एकूण ९० लाभार्थ्यांसाठी १,३५,००० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. तरी आरंभीलेल्या या मदत कार्यात आपण योग्य ती मदत करावी अशी विनंती ग्राम स्वराज समिती आणि निऋति लोकार्ट यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
लोककला राहत कोष एक उपक्रमाचे समन्वयक म्हणून कल्पतेश देशमुख हे काम पाहत आहेत. तसेच ग्राम स्वराज समितीचे अध्यक्ष मा. शंकर बगाड़े व विश्वस्त मा.डॉ. सुगन बरण्ठ यांचे मार्गदर्शन लाभत असून. मा. चंद्रकांत ग्रोगरी यांचे मोलाचे अर्थसहाय्य लाभले आहे. तसेच विजया ठाकुर, सागर नागणे, सचिन आग़ोने, लोककालवंत प्रकाश वाघ, शाहिर परशुराम सुर्यवंशी, मोरसिंग राठोड यांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभत आहे.