सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन १९७२ च्या काळातील रस्त्याची ओळख करुन देण्यासाठीचा प्रयत्न सफल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०७/२०२३
समृध्दी महामार्ग योजना राबवून महाराष्ट्रातील सर्वच रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू असून याच समृद्धी महामार्ग योजनेत जामनेर ते पाचोरा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. परंतु एवढे चांगले रस्ते बनवल्यावर सुद्धा एखाद्या ठिकाणी छोटासा जरी खड्डा पडला तरी वाहनधारक व सर्वसामान्य नागरिक शासनाच्या नावाने खडे फोडत असतात म्हणून मागील काळात रस्त्यांची परिस्थिती अशी होती तरीही तेव्हा कुणीही तक्रार करत नव्हते हे दाखवण्यासाठी जामनेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सन १९७२ च्या काळातील रस्ते कसे होते हे दाखवून देण्यासाठी मालखेडा ते शेंदुर्णी दरम्यान ठिकठिकाणी रस्त्यावर जाड गाडी टाकून त्या ठिकाणी डांबरीकरण न करता रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे.
या मागील कारण शोधले असता जन माणसातून मिळालेली माहिती अशी की शासन जितक्या जास्त सुविधा देत आहे. तितक्याच तक्रारी सर्वसामान्य नागरिक करत असतात म्हणून त्यांना मागील काळातील रस्त्यांची परिस्थिती कशी होती हे दर्शवण्यासाठी हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उठाठेव असल्याचे बोलले जात आहे. परंतु यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांना तसेच एस. टी. तील प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावरून प्रवास केल्यास एखाद्या व्यक्तीला जर सांधे दुखी, अंग दुखीचा त्रास होत असेल तर तो त्रास या रस्त्यावर प्रवास केल्यानंतर कोणतेही औषधोपचार न आपसूकच कमी होत असल्याची टीका केली जात आहे. म्हणून संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाकडे लक्ष देऊन त्वरित डांबरीकरण करून जनतेच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली जात आहे.