न्याय देवते डोळ्यावरची पट्टी खोल, खरे, खोटे हातामधल्या तराजूमध्ये तोल, बोल आता तरी खरे बोल.
दिनांक~११/०५/२०२३
न्याय देवते डोळ्यावरची पट्टी खोल, खरे, खोटे हातामधल्या तराजूमध्ये तोल, बोल आता तरी खरे बोल.
संतोष पाटील
——————————————–
प्रेषितांचे, देवदेवतांचे, महामानवांचे, लढवय्या शूरवीरांचे, असे न्यायनीतीच्या व लोकशाहीच्या मार्गावर चालणारे राष्ट्र म्हणून भारत देशाची ख्याती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकीय, सामाजिक कार्यपद्धतीचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेबांनी या भारत देशाचे संविधान लिहिलेले आहे, या देशात अनेक धर्मग्रंथ, धर्मपंथ, समाज, देवदेवता, साधुसंत अनेक विचार आहेत.
मात्र हा देश धर्मग्रंथांच्या आधारे चालत नाही तो संविधानाच्या आधारेच चालतो, प्रचंड अशा महाकाय देशामध्ये आदर्श अशी लोकशाही स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यंत कार्यरत आहे, मात्र गेल्या काही वर्षांपासून या लोकशाहीला कुणाची दृष्ट लागली हेच कळत नाही. देशातील प्रत्येक घटकाचा समाजाचा विचार लोकशाहीने केला पाहिजे. समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी, जनतेचं हीत साधले जावे, सर्वांना आनंदानं निर्भयपणे जीवन जगता यावे, आपल्या समाजाचे, धर्माचे, व्यवसायचे, मालमत्तेचे व जीवीताचे संरक्षण व्हावे म्हणून काही नियम व कायदे केले जातात. त्या आधारे देश चालतो, मात्र हे कायदे सर्व समावेशक आसले तर समाजातील सर्व घटकांचा विकास होतो.
जर एखाद्या घटकावर अन्याय होत असेल तर त्याला कायदानं लढता येत मात्र सध्या या देशामध्ये असे होतांना दिसत नाही. न्यायनीती, सत्य व्यवहार या गोष्टींना तिलांजली देऊन मूलभूत शाश्वत प्रश्न बाजूला ठेवून हा देश विकासाची वाट चालतोय, खरं म्हणजे याला विकास म्हणावं की अधोगती हेच कळत नाही, गेल्या काही दिवसापासून माननीय सुप्रीम कोर्ट तसेच देशातील स्वयत्ता संस्था CBI, ED इत्यादी पक्षपातीपणे काम करत आहेत, देशातील न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या बाजूने सगळे निर्णय लागतात विरोधातल्या पक्षातील लोकांना त्रास दिला जातो, त्याच्यात महाराष्ट्रातील राजकारणात जी परिस्थिती निर्माण झाली ती अतिशय निंदनीय व अव्यवहारी आहे. सूडबुद्धीच राजकारण आणि नीचपणाचा कळस या देशातील राजकर्त्यांनी गाठलेला आहे,
एखाद्या राजकीय पक्षाला हुकूमशाहीच्या मार्गाने कसे नेस्तनाबूत करता येते स्वयत्ता संस्था सुप्रीम कोर्ट यांच्यामध्ये हस्तक्षेप करून पाहिजे तसा निकाल लावून आपला कार्यभाग साधून देशाची प्रतिमा मलीन केली जात आहे, देशामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की देश नेस्तानाबूत होण्याच्या मार्गावर आहे आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज असतांना हे सत्तेतले लोक हुकूमशाहीच्या मार्गाने देश बरबाद करण्यासाठी राज्य करत आहेत, या देशातील न्यायदेवतेला उपहासात्मक का होईना असं म्हणण्याची वेळ आली आहे की न्यायदेवते आता तूच डोळ्यावरची पट्टी खोल, खरं खोटं तराजू मध्ये तोल, आणि आता काहीतरी बोल काहीतरी बोल…..
संतोष पाटील
7666447112