शेतकऱ्यांनी लावला निसर्गाच्या भरवशावर सट्टा, शासन उडवतेय त्यांचीच थट्टा. सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांचा आरोप..
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०२/२०२३
आज आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती म्हणजे “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” अशी झाली असून आजचा दिवस गेला, उद्या तरी शासनाकडून आपल्या पदरात काहीतरी पडेल अशी आशा उराशी बाळगुन जीवन जगत आहे. शेतकरी हा दरवर्षी हाडाचे पाणी करुन शेतात राब, राब, राबून उधार, उसनवार तसेच कर्ज काढून बि, बियाणे, खते, किटकनाशके वापरुन जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी प्रयत्नशील असतो परंतु कधी निसर्गाचा कोप तर कधी शासन, प्रशासन व बाजारपेठेत चुकीचे नियम व भावातील तफावत यात सुसुत्रता नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. याच विवंचनेत आजपर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
असाच काहीसा प्रकार यावर्षीही झाला असून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी करण्यासोबतच पिक विमा काढला होता. यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले. हे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीच्या नियमानुसार लगेचच ७२ तासांच्या आत झालेल्या नुकसानीची ऑनलाईन तक्रार करणे बंधनकारक होते. त्यानुसार बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जाऊन पिके नष्ट झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी तासंतास शेताच्या बांधावर उभे राहून तक्रार नोंदवण्यासाठी प्रयत्न केले मात्र नेमके त्याच कालावधीत तब्बल ७२ तास सर्व्हर डाऊन असल्याकारणाने असंख्य शेतकऱ्यांना पिकांच्या झालेल्या नुकसानीची ऑनलाईन तक्रार करु शकले नाहीत. व मोठ्या प्रमाणात शेतकरी नुकसान भरपाई मिळवण्यापासून वंचित राहिले आहेत.
याचीच दाखल घेऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख मा. श्री. उध्दव भाऊ मराठे, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांना सोबत घेऊन दिनांक ०३ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी पाचोरा तालुक्याचे तहसीलदार साहेब मा. श्री. कैलासजी चावडे व तालुका कृषी अधिकारी मा. श्री. रमेश जाधव यांची भेट घेऊन पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची अत्यंत तुटपुंजी रक्कम मिळाली याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले व चर्चा घडवून आणली.
या चर्चेत शिवसेनेच्या नेत्या सौ. नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी व शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफणा यांनी पाचोरा तालुक्यातीय १४०१८ शेतकर्यांनी विमा हप्त्याची रक्कम, शेतकरी संख्ख्या, शेतकरी हिस्सा, राज्यशासन हिस्सा, केंद्रशासन हिस्सा, विमा संरक्षित १४०१८/ २,५८६९८२८ / १,३४,६०६०६ / १३४६५०, / ६०६ ५२,००,२७२६४ म्हणजेच शेतकऱ्यांच्या विमा हप्त्यापोटी ५,२१९००४०२ रुपये इतकी रक्कम कंपनीकडे भरण्यात आली व कंपनीने पळवाटा शोधून एक ३,३६,९९२६० रुपये शेतकयांच्या खात्यत जमा केले अशी माहिती देत संपूर्ण लेखाजोखा मांडत शेतकऱ्यांची विमा कंपनीकडे जमा झालेली रक्कम व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली रक्कम यातील तफावत दाखवून विमा कंपनीने शेतकऱ्यांची एकप्रकारे चेष्टा केली असल्याचे मत व्यक्त करत सगळ्या शेतकऱ्यांना पुरेपूर नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली.
तसेच या तफावतीचे मुख्य कारण म्हणजे ज्या, ज्या वेळी अतिवृष्टी झाली त्या, त्या वेळी इन्शुअरस कंपनीचे सर्व्हर बंद असल्याचा वाईट अनुभव आल्यामुळे पुष्कळसे शेतकरी ७२ तासांच्या आत विमा कंपनीला आपल्या झालेल्या नुकसानीची माहिती कळवू शकले नाहीत. तसेच सर्व्हर डाऊन झाले नव्हते तर ते मुद्दामहून करण्यात आले होते असाही आरोप हजारो शेतकऱ्यांनी केला असल्याचे मत व्यक्त केले. तरी ॲग्रो इंशुअरंड कंपनीच्या प्रतिनिधीनी याची गंभीर दखद घ्यावी अन्यथा हजारो शेतकऱ्यांना आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोहन करावे लागेल अशी वेळ येऊ देऊ नये असा सुचना वजा गंभीर इशारा दिला आहे.
या इशाऱ्याची दाखल घेऊन तहसीलदार मा. श्री. कैलासजी चावडे साहेब व तालुका कृषी अधिकारी मा. श्री. रमेश जाधव यांनी समस्या जाणून घेत दिनांक ०९ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी सकाळी ठिक ११ वाजता गिरड रस्त्यावर असलेल्या कृषी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी. केलेल्या तक्रारी, तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे योग्य नुकसानभरपाई मिळावी म्हणून कृषी विभागाच्या माध्यमातून एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी (A.I.C.) कडे केलेले तक्रारी अर्ज व भरलेल्या विमा व मिळालेली तुटपुंजी रक्कम तसेच सर्व्हर डाऊन असल्याकारणाने शेतकऱ्यांना आलेल्या अडचणी व झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा घडवून आणणार आहेत.
सत्तेत नसतांना मा. श्री. गिरीश भाऊ महाजन व रक्षाताई खडसे.