पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे पाच गावांचा पाणी प्रश्न ऐरणीवर, संतप्त ग्रामस्थांनी पाटचारीच्या दरवाज्याला ठोकले कुलूप.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०२/२०२४
पाचोरा तालुक्यातील कोकडी तांडा गावाजवळील म्हसळा धरणातून वडगाव आंबे, कोकडी तांडा, कुऱ्हाड, वडगाव आंबे खुर्द व बुद्रुक या गावच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून या गावातील पाण्याच्या पाण्याचा तसेच वरील गावातील पाळीव जनावरे तसेच जवळच असलेल्या मालखेडा, लोहारा व वडगाव आंबे शिवारातील राखीव जंगलातील जंगली प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे.
1k2XHU0OAu#ri6yuFao@@$LY
असे असले तरीही आज या कोकडी येथील म्हसळा धरणातून दुसरे आवर्तन सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी आले असता ग्रामस्थांनी पाटाला पाणी सोडण्यात येऊ नये म्हणून पाटबंधारे विभागाच्या पाटकऱ्यांना सांगितले व पाटाला पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केला तर आम्ही आंदोलन करु अशी भुमिका घेत पाटबंधारे विभागाच्या पाटाला पाणी सोडण्यासाठी असलेल्या दरवाज्याला कुलूप लावून विरोध दर्शविला आहे. कारण मागील महिन्यात याच म्हसळा धरणातून दिनांक ०५ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी पाटाला पाणी सोडण्यात आले होते. परंतु हे पाणी सोडतांना नियमानुसार दररोज सकाळी योग्य वेळी पाटाला पाणी सोडून दररोज सायंकाळी ठरवून दिलेल्या वेळेत पाट बंद करणे गरजेचे होते.
तरीही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी दिनांक ०५ जानेवारी २०२४ शुक्रवार पासून तर २२ जानेवारी २०२४ सोमवार पर्यंत रात्रंदिवस म्हणजे अहोरात्र चोवीस तास पाणी सोडल्याने धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले आहे. तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच विद्युत वितरण चे अधिकारी व कर्मचारी यांच्या मुक संमतीने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विद्युत पंपाच्या साहाय्याने रात्रंदिवस पाणी उपसा केला आहे व आजही चोरट्या मार्गाने पाणी उपसा सुरु असल्यावरही पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनीकडून यांच्यावर कारवाई का केली जात आहे असा प्रश्न जनमानसातून विचारला जात आहे.
विशेष वृत्त ~ पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पाटाला पाणी देण्यासाठी रितसर अर्ज भरुन घेतले होते. म्हणून आम्ही शेतकऱ्यांनी दुबार पीक घेण्यासाठी पावसाळी पिके काढून शेतमशागत करून रब्बीची पिके पेरली आहेत. परंतु आता ऐनवेळी पाठाला दुसरे आवर्तन सुटत नसल्याने आमची पिके हातची जाऊन केलेली मेहनत व येणारे उत्पन्न हातचे जाणार असल्याने मोठे नुकसान होणार आहे. जर पाटबंधारे विभागाने दुसरे आवर्तन सोडले नाही तर आम्ही रीतसर न्यायालयात जाऊन आमच्या पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी करू असा खुलासा उद्धव बाळासाहेब ठाकरे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण भाऊ पाटील यांनी सत्यजित न्यूज कडे केला आहे
(सविस्तर वृत्त पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटल्यावर)