जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना, आता उघड होईल कापूस चोरीचा गुन्हा. कारागृहातील संशयितांना तीन दिवसांची पोलिस कस्टडी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०२/२०२३
शिंदाड येथील कापूस चोरीच्या प्रकरणातील आरोपींना तालुका न्यायालयात पोलिस कस्टडी ऐवजी (एम.सी.आर) मिळाल्यावर गुन्ह्यांच्या तपासासाठी संबंधित आरोपींना पोलिस कस्टडीत घेणे अत्यंत गरजेचे होते. म्हणून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अपीलात जाऊन पोलिस कस्टडीची मागणी केली असता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने सर्वच्या, सर्व संशयित आरोपींना दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ सोमवार पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली असल्याने आता पिंपळगाव हरेश्र्वर परिसरात झालेले बरेचसे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात असून चोरीचा कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचा भांडाफोड होणार असल्याने पंचक्रोशीतील जनतेच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
(अश्रूंची झाली फुले)
याकामी ॲड. या. श्री. सुनीलजी चोरडिया यांनी सरकारतर्फे बाजू मांडतांना जोरदार युक्तिवाद केला व पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे पोलिस हेड कॉन्स्टेबल मा. श्री. आर. के. पाटील. यांनी न्यायालयात आपली बाजू मांडली यावेळी ते कायद्याच्या चौकटीत राहून बोलत असतांनाच त्यांच्यातील शेतकरी पुत्र जागा झाला व आपले मत मांडतांना त्याचे डोळे अक्षरशः पाणावले होते. त्यांचे म्हणणे ऐकून घेत जळगाव जिल्हा मा. सत्र न्यायाधीशांनी जेव्हा आरोपींना पोलिस कस्टडी सुनावली तेव्हा पोलिस हेड कॉन्स्टेबल आर. के. पाटील यांच्या डोळ्यात अश्रू व चेहेऱ्यावर आनंद दिसून येते होता. कारण रात्रंदिवस शेतकरी शेतात राबून काबाडकष्ट करुन पिक घेत असतो हे करतांना काय हाल होतात हे त्यांना ज्ञात होते कारण साप्ताहिक सुटीच्या दिवशी मी सुद्धा शेतात राबतो असे त्यांनी सांगितले.
पाचोरा तालुक्यातील गावागावातून शेतीमालासह घरफोडी व इतर प्रकारच्या भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरुच असून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड गावात पाच शेतकऱ्यांच्या प्लॉट, पत्र्याच्या शेडमध्ये व घरात ठेवलेल्या कापूस चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली असून दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवार रोजी पिंपळगांव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ३१/२०२३ भादवि कलम ४६१ ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या कापूस चोरीच्या घटनेत नितीन परमेश्वर पाटील यांच्या मालकीचा २,७२,००० रुपये किंमतीच्या कापसापैकी अंदाजे ४००००/०० किंमतीचा ०५ क्विंटल, उत्तमराव बालचंद परदेशी यांच्या मालकीचा अंदाजे १,२०,००० किंमतीचा १५ क्विंटल, शालिक आनंदा पाटील यांच्या मालकीचा अंदाजे ४०,००० रुपये किंमतीचा ०८ क्विंटल, अशोक गिरधर चौधरी यांच्या मालकीचा अंदाजे १६,०००/०० रुपये किंमतीचा ०२ क्विंटल, हरी अमृत चौधरी यांच्या मालकीचा अंदाजे ५६,०००/०० रुपये किंमतीचा ०७ क्विंटल कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत कापूस उत्पादक शेतकरी, साक्षीदार नितीन परमेश्वर पाटील, उत्तमराव बालचंद परदेशी, शालिक आनंदा पाटील, अशोक गिरधर चौधरी व हरी अमृत चौधरी यांनी पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली होती.
या फिर्यादीवरून जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक मा. श्री. एम. राजकुमार साहेब, चाळीसगाव परिमंडळचे अप्पर पोलीस अधीक्षक मा. श्री. रमेश चोपडे साहेब, पोलीस उपविभागीय अधिकारी भाग पाचोराचे मा. श्री. अभयसिंग देशमुख साहेब, पिंपळगाव हरेश्र्वर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. महेंद्र वाघमारे साहेब, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मा. श्री. अमोल पवार, सहाय्यक फौजदार मा. श्री. रामकृष्ण पाटील, पोलिस कॉन्स्टेबल श्री. जितेंद्र पाटील, श्री. मुकेश लोकरे, पोलिस हेड कॉन्स्टेबल श्री. रणजित पाटील पोलिस नाईक श्री. शिवनारायण देशमुख, पोलिस नाईक श्री. अरुण राजपूत, श्री. दिपकसिंग पाटील, श्री. अभिजित निकम, श्री. प्रशांत पाटील, अमोल पाटील, संदिप राजपूत, यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरुन संशयीत आरोपी समीर जलाल तडवी, वय- १९ वर्षे, शकील मुश्ताक तडवी, वय २२ वर्षे, अफसर दगडु तडवी, वय १९ वर्षे, ईमान सलीम तडवी, वय २६ वर्षे, शकील बिस्मिल्ला तडवी, वय ३१ वर्षे, विनोद कचरु तडवी वय ३६ वर्षे, रहीम मुश्ताक तडवी, वय २३ वर्षे, अनिल दिलावर तडवी, वय- २५ वर्षे, अस्लम हुसैन तडवी, वय २१ वर्षे, सर्व रा. शिंदाड, ता. पाचोरा यांचा लागलीच शोध घेवुन त्यांना ताब्यात घेवुन गुन्ह्यांच्या तपासासाठी अटक केली व पुढील तपासासाठी पाचोरा न्यायालयात हजर करुन पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. होती परंतु सर्वच्या, सर्व संशयित आरोपींना पाचोरा न्यायालयाने पोलिस कस्टडी नाकारत (एम.सी.आर) दिल्यामुळे सर्व संशयित आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी करण्यात आल्यामुळे तपासात व्यत्यय आल्याने या अगोदर झालेल्या कापूस चोरीचा व चोरीचा कापूस विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचा शोध घेणे गरजेचे होते. म्हणून पिंपळगाव हरेश्र्वर पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व परवानगीने जळगाव जिल्हा न्यायालयात कापूस चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलिस कस्टडी मिळावी म्हणून अपील केले होते.