बिलवाडी येथील मतिमंद मुलीवर अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, मानव हित लोकशाही पक्षाची मागणी
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०६/२०२१
जामनेर तालुक्यातील बिलवाडी येथील मतिमंद मुलीवर काही नराधमांनी अत्याचार केल्याची घटना घडली असून या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शासन होऊन सामाजिक न्याय विभागातर्फे पिडीत कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत मंजूर करुन त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मानवहित लोकशाही पक्षातर्फे पाचोराचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात करण्यात आली आहे.
पाचोरा उपविभागीय पोलिस अधिकारी मा.श्री. भरत काकडे साहेब यांनी मानवहित लोकशाही पक्षाचे निवेदन स्वीकारून संबंधितांशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेत गुन्हा दाखल झाल्यापासून आमचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून आतापर्यंत सहा आरोपींना अटक केली असल्याचे सांगत या प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही. व लवकरात लवकर आरोपपत्र न्यायालयात दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा कशी होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य प्रदेश राधाकृष्ण साठे साहेब व आकाश घोलप साहेब मीडिया अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य प्रदेश अशोक बाविस्कर साहेब,महाराष्ट्र खानदेश विभाग युवा अध्यक्ष विलास भालेराव,जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील भाऊ पाचुंदे,युवा जळगाव जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण शिंदे,महिला आघाडी अध्यक्षा कल्पना नंदू शेजवळ,युवा उपाध्यक्ष अनिल भाऊ पाचुंदे,जिल्हा कार्याध्यक्ष गजानन चंदनशिवे,जिल्हा संघटक गौतम निकम साहेब,जिल्हा प्रवक्ता विनोद भाऊ कांबळे,जिल्हा कार्यकर्ता गणेश शिरसाट जळगाव,जिल्हा संपर्कप्रमुख विजय वाघ,पाचोरा तालुका अध्यक्ष योगेश गायकवाड,तालुका सचिव जितेंद्र गायकवाड,भडगाव तालुका अध्यक्ष सुरज भाऊ पाचुंदे,एरंडोल तालुका अध्यक्ष महेंद्र भोई,पारोळा अध्यक्ष विश्वास थोरात*
*चाळीसगाव अध्यक्ष दीपक भाऊ चांदणे,तालुका उपाध्यक्ष रवींद्र साळुंखे साहेब,तालुका कार्याध्यक्ष बाप्पू काळे*
तालुका सचिव नाना शिरसाट,सोशल मीडिया अध्यक्ष प्रदीप गायकवाड,सुभाष भाऊ मोरे कार्यकर्ता,नाना गायकवाड कार्यकर्ताव सर्व समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते.