शेतकऱ्यांच्या अडीअडचणी त्वरित सोडवा नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरेल, विद्यूत वितरण कंपनीला आ.किशोर आप्पा पाटील यांचा इशारा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०५/२०२१
जुन महिना हा शेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असून या महिन्यात अत्यल्प पाणी असल्यावरही शेतकरी जिवाचे रान करुन ठिबकद्वारे कापूस पिक घेण्यासाठी प्रयत्नशील असतो.तसेच शेतकऱ्यांना रात्री बे रात्री ठराविक वेळेपूरताच विद्यूतपुरवठा केला जातो. तो सुरु असतांना विद्यूतपुरवठा सुरळीत नसतो कधी कधी तर कमी दाबाने विद्यूतपुरवठा होत असल्याने शेतीपंप चालत नाहीत व सतत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यूतपंप जळण्याच्या घटना घडतात व याच महत्वाच्या दिवसात शेती कामे खोळंबली तर शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या हंगाम हातचा जाऊन स्वप्नांचा चुराडा होतो याचे एकमेव कारण म्हणजे विद्यूत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार.
विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी स्वता चोवीस तास पंख्याखाली बसून कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसून असतात. एकही कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. या कारणांमुळे शेतकऱ्यांचा मानसिक छळ व आर्थिक नुकसान होते म्हणून ही समस्या वारंवार सांगूनही विद्यूत वितरण कंपनी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ५ दिवसांचा अल्टीमेटम दिला असून जर त्यांनी येत्या ५ दिवसात शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही तर आम्ही आता शिवसेना स्टाइलने न्याय मिळविण्यासाठी शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरु अशी पूर्व सुचना काल भडगाव, पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटिल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
राज्य सरकार ने विजबिलाची ५० टक्के थकबाकी वसूल करण्याचे आदेश दिले असतांना विजवितरक कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून ब्लैकमेल करुन बिल जमा करुन चालू बिलात रक्कम जमा करत आहे. यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात थकित बिलाची मोठी रक्कम भरावी लागेल. शेतकऱ्यांना शेतीसाठी दररोज ४ तास विज मिळते त्यातही आठवड्यात फ़क्त ३ दिवस दिवसा व ४ दिवस रात्री विज मिळते. त्यातही ट्रांसफॉर्मर जळाले भरा पैसे, पोल पडला भरा पैसे, तार तुटले भरा पैसे अशा पद्धतीने विजवितरक कंपनी शेतकऱ्यांकडून वसूली करुन त्यांचा मानसिक छळ करीत आहे.
शेतकरी आधीच कोरोना मूळे संकटात सापडला आहे. आता ऐन पेरणीत जर त्याला वेळेवर विज मिळाली नाही तर हे वर्ष देखील खराब होईल. एका थकबाकीदारा मुळे त्या शेतीशिवारच्या सर्व शेतकऱ्यांची विज बंद केली जाते अशाही शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्याचे आ पाटिल म्हणाले.
अधिकाऱ्यांची घेतली बैठक
या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी व अधिकाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आमदार पाटिल यांनी आज सकाळी विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत अधिकाऱ्यांनी उड़वाउडविची उत्तरे दिली. आमदार पाटिल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपण विजबिल यूनिट कोणत्या आधारावर देतो ? शेतकरी किती वेळ विज वापरतो ? तुम्ही त्यांना किती वेळ विज देतात?, त्याच्या विहिरीत पाणी आहे का?, शेताचे क्षत्र किती?, मोटार किती पावर ची आहे? इत्यादि माहिती येत्या ५ दिवसात देण्याच्या सुचना दिल्या आहेत. जर ५ दिवसांत सदर माहिती देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या नाही तर मात्र मी शिवसेना स्टाइलने शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल मग जे काही होईल त्यास भडगाव, पाचोरा तालुक्यातील सर्व अधिकार तसेच जिल्हास्तरीय अधिकारी जबाबदार असतील अशी पूर्व सुचना आमदार किशोर पाटिल यांनी दिली आहे.