प्रवासाला निघाला तर फक्त एक बाटली पोलीस बांधवांसाठी सोबत घेऊन निघा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०६/०४/२०२४
आपल्या आयुष्यात एखाद्यावेळी जर आपल्यावर संकट ओढवल तर अगोदर आठवतात ते सर्वात प्रथम आपले आईवडील, देव अश्यावेळी प्रत्यक्षात देव येत नाही मात्र म्हणून या यानंतर आठवतो तो देवमाणूस, देव माणूस म्हणजे कोण तर तो असतो खाकी वर्दीतील पोलीस खरच पोलीस, पोलीस हे राज्यसरकारचे कर्मचारी असून कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे. तसेच आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करण्याचाही त्यांना अधिकार असून पोलीस हे कर्तव्यनिष्ठ व कर्तव्यदक्ष असतात अश्या या पोलीसांमुळे आपण आज सुरक्षित आहोत.
असे असले तरी पोलीसांचे जीवन मात्र आजही सुरक्षित नाही असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण पोलीस हे उन वारा, पाऊस, नैसर्गिक संकट, दंगा, मोर्चा, आंदोलन, यात्रोत्सव व इतर सार्वजनिक, राजकीय कार्यक्रमात बंदोबस्त करण्यासाठी भररस्त्यावर, जंगलात, निर्जनस्थळी रात्रंदिवस उभे असतात. वेळप्रसंगी राष्ट्रहित व जनहितार्थ ते स्वताच्या जीवाची पर्वा न करता स्वताला झोकून देतात. असे असले तरी कायदा सुव्यवस्थेचा थोडाही प्रश्न निर्माण झाला की आपण सरळसरळ पोलीसांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवून मोकळे होतो.
मान्य आहे व लोकशाहीत तो तुमचा, आमचा अधिकार आहे. परंतु आपण अधिकार गाजवतांना आपणही या समाजाचे या देशाचे काही देणे लागतो ही भावना मनात बाळगून काहीतरी केले पाहिजे कींवा जे राष्ट्रहित व समाजहितासाठी झटत आहेत त्यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे अशी भावना मनात बाळगून आपण दररोजच्या दैनंदिन कामानिमित्त किंवा कोणतीही कारणाने प्रवासाला निघतांना रखरखत्या उन्हात भररस्त्यावर निर्जनस्थळी उभे राहून चोवीस तास सेवा बजावणाऱ्या पोलीस बांधवांसाठी फक्त आणि फक्त एक बाटली पाण्याची सोबत घेऊन निघा व जेथेही पोलीस बांधव भेटतील त्यांना द्या म्हणजे आपणही काहीतरी केल्याचे समाधान मिळेल व आपल्यासाठी काम करणाऱ्या पोलीसांचे मनोबल वाढले हे निश्चित.