डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संघटनांच्या बळकटीकरणासाठी आज समता सैनिक दलातर्फे चर्चा व परिसंवादाचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/०२/२०२४
आजच्या परिस्थितीत अराजकतेकडे चाललेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व त्यांनी स्थापन केलेल्या संघटनांची व मानवतावादी तत्वज्ञानाची अत्यंत गरज असल्याकारणाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वधर्मसमभाव राखुन कठोर भुमिका घेत संविधानाची निर्मिती करुन सर्व भारतीयांना उन्नतीचा, सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे म्हणून आपण आज याची फळ चाखत आहोत.
असे असले तरी आपण आज वेगवेगळ्या कारणांनी एकमेकांपासून लांब चाललो आहोत तसेच वाढती व्यसनाधीनता, गटबाजी यामुळे आपले संघटन विखुरले गेले असल्याने आपल्या नाकर्तेपणाचा फायदा काही लोक घेत असल्याचे दिसून येते म्हणून डॉ. बाबासाहेबांचे विचार जीवंत ठेवण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या संघटना पुनश्च उभ्या करुन डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या तत्वज्ञानाचा अवलंब करुन स्वाभिमानाने जगण्यासाठी आपण आज समता सैनिक दलाच्या माध्यमातून पाचोरा येथे समता जिल्हा सह सचिव आयुष्यमान ज्ञानेश्वर सावळे, जिल्हा संघटक आयुष्यमान अरुण खरे, जनार्दन जावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चर्चा व परिसंवाचे आयोजन केले असल्याची माहिती पाचोरा समता सैनिक दलाचे तालुकाध्यक्ष आयुष्यमान किशोर डोंगरे यांनी दिली आहे.
तरी या चर्चा व परिसंवाद मेळाव्यात सविस्तर चर्चा करुन समता सैनिक दलाची ध्येय, धोरणांची ओळख करुन देत संघटनेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी होतकरु तरुणांची फळी उभी करण्यासाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ बुधवारी रोजी जारगाव चौफुली जवळील व्यंकट गोपाल मंगल कार्यालय येथे सकाळी दहा वाजता जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते व समाजबांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समता सैनिक दलाचे अध्यक्ष शांताराम सपकाळे, उपाध्यक्ष भागवत मोरे, राहुल साठे, अजय संसारे, उपाध्यक्ष आनंद सुरवाडे, दशरथ तांबे, आदेश जाधव, योगेश निकम, विकास सोनवणे, कुंदन सोनवणे यांनी केले आहे.