आखतवाड्यात शोष खड्डे कामात भ्रष्ठाचार होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०९/२०२२
शोषखड्डा हा सांडपाण्याची विल्हेवाट करण्यासाठी केलेला खड्डा होय. राहते. परसबाग व शोषखड्डा हे प्रत्येक कुटुंबात करता येते.घराभोवती, रस्त्यात आणि गटारीत तुंबलेले सांडपाणी आरोग्यास घातक असते. तसेच त्याचा घाण वास येतो, रस्त्यावर त्या पाण्याने चिकचिक होऊन घसरडे होते आणि डासांना अंडी घालायला जागा मिळते. हे डास चावल्याने लोकांना मलेरियासारखे रोग होतात. अशा सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी जमिनीत सांडपाणी जिरण्यासाठी परसबाग किंवा शोषखड्डा करता येतो.
घरातील सांडपाण्याची योग्य पद्धतीने केलेली विल्हेवाट म्हणजे शोषखड्डा होय. सांडपाणी तयार केलेल्या शोषखड्डयात सोडावे, तेथून ते जमिनीत मुरते. आंघोळीच्या मोरीतील, धुण्याभांडीच्या पाण्याचीही विल्हेवाट शोषखड्ड्याद्वारे होऊ शकते. वाळु असलेल्या, मुरमाड जमिनीत ह्या पाण्याचा चांगला निचरा होतो. पण चिकणमाती असलेल्या जमिनीत मात्र याचा फारसा उपयोग होत नाही. अशावेळी चर खणून पाण्याला दूर न्यावे लागते. त्यामुळे रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यास आळा बसेल व त्यापासून रोगराई टाळण्यास मदत होते. त्यामुळे शोषखड्डे तयार करणे उपयोगाचे ठरते.
गावागावातून दैनंदिन वापरातील बाथरुम व इतर वापरासाठीचे सांडपाणी वाहून न जाता ते जमिनीत झिरपून जिरले पाहिजे तसेच शोषखड्डा केल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वाहून न जाता तसेच उघड्या गटारीच्या व्दारे वाहून जातांना गावात ठिकठिकाणी डबके साचून गावात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून शासनाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत घर तेथे शोषखड्डा अशी योजना अमलात आणली असून पाचोरा तालुक्यातील आखतवडे गावात नदी पात्राला लागुन असलेल्या घराजवळ पाणी पुरवठा विभागामार्फत प्रत्यक्षात शोष खड्डे बनवण्याच्या कामाला प्रत्येक्षात सुरुवात केली आहे.
परंतु हे गोल शोषखड्डे बनवतांना संबंधित ठेकेदाराने शोषखड्डा खोदकामापासुन सदर कामाबाबत गावातील नागरिकांना जास्त काही माहिती नसल्याने गोल खड्डा खोदून बांधकाम करतांना शोषखड्डा पुर्ण झाल्यानंतर त्या खड्ड्यावर आसारी (लोखंडी गज) आसारी टाकून सिमेंटचा वापर करुन स्लॉब टाकून झाकण बनवतांना मात्र आसारी ऐवजी बारीक तारांचा वापर करुन तसेच कमी प्रमाणात सिमेंट वापरुन स्लॉब टाकून शोषखड्डे झाकण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुज्ञ नागरिकांनी केला आहे.
यामुळे शोष अड्ड्यावर टाकण्यात येणारे झाकण कमकुवत बनवले जात आहे. हा प्रकार असाच सुरु राहील्यास भविष्यात एखाद्यावेळेस कळतनकळत याच खड्ड्यावर लहान मुले किंवा पाळीव प्राणी हे सहज गेल्यास या शोषखड्डा वरील स्लॉब कोसळून लहान मुलांना जीविताला धोका होण्याची दाट शक्यता आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणून मागील काही दिवसांपूर्वीच शोषखड्डे बनवले असून काही शोषखड्ड्यांवरी टाकण्यात आलेले झाकण लगेचच तुटल्याने ते पुन्हा बनवण्यासाठी ठेकेदाराला भाग पडले आहे.
या शोषखड्डे बांधकामाबाबत आखतवडे गावात जनमानसातून उलटसुलट चर्चा ऐकायला येत असून संबंधित ठेकेदार व संबंधित इंजिनिअर यांची मिलीभगत असल्याने हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत आखतवडे येथील काही जागरुक व सुज्ञ नागरिकांनी पाणी पुरवठा विभागाचे इंजिनिअर मा. श्री. राठोड साहेब यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून शोषखड्डे बांधकामाबाबत माहिती देऊन खरा प्रकार नेमका काय आहे याबाबत विचारणा केली असता मी चौकशी करुन सांगतो असे उत्तर मिळत आहे. तर दुसरीकडे शोषखड्ड्यांचे निकृष्ट बांधकाम सुरुच असल्याने हा गैरप्रकार केव्हा थांबेल अशी शंका व्यक्त केली जात आहे.