महावितरण अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच कोर्ट अवमान याचिका दाखल करणार विठ्ठल पवार राजे.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०८/०६/२०२३
पाचोरा तालुका महावितरणने उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरून त्यांचा विद्युत पुरवठा अवेळी खंडित करून मानसिक, शारीरिक व कौटुंबिक त्रास दिल्याने पाचोरा तालुक्यातील कार्यकारी अभियंता उपअभियंता व संबंधितांविरुद्ध कंटेंट ऑफ कोड कलेक्टर जळगाव यांच्याकडे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. विठ्ठल पवार राजे यांनी नुकतेच जाहीर केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जनहित याचिकाकर्ते राज्य अन्न आयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना संपूर्ण भारत महाराष्ट्र राज्य विठ्ठल पवार राजे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा जळगाव येथे दिनांक ५ जून २०२३ सोमवार रोजी रात्री दहा वाजता विजय पाटील सह उत्पादक शेतकऱ्यांचे महावितरणच्या कार्यालयासमोर चक्री आंदोलन सुरू केले. त्यानंतर त्यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांनसमोर सांगितली.
विद्युत वितरण कंपनीमध्ये मनमानी सुरु असल्याने कपाशी व लागवडीसाठी तयार केलेल्या शेतांचे लाखो रुपयांचे नुकसानीस महावितरणचे अधिकारी जबाबदार आहेत असा संघटनेचा आरोप आहे.
“संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया”
एका बाजूला शेतकरी जगेल तरच राष्ट्र जगेल, शेतकरी खुखी तर जग सुखी, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्यांना मोफत चोवीस तास वीज पुरवठा करु असे भाषणात वारंवार सांगत घराघरात, दारादारात फीरुन हातापाया पडून मोठमोठे आश्वासन देऊन मते मिळवून घेतली जातात व एकवेळ सत्ता हाती आली की आम्ही कोण व तुम्ही कोण अशी वागणूक मिळत असल्याची खंत हजारो शेतकऱ्यांनी सत्यजित न्यूज कडे बोलुन दाखवली.