औरंगाबाद शहरामध्ये आज आगळी वेगळी शिवजयंती साजरी रस्त्यावरील भिकार्रांचा केला कायाकल्प. सुलक्ष्मी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुपचा स्तुत्य उपक्रम.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१९/०२/२०२१
(औरंगाबाद मधील रस्त्यावरील भिकारी झाले चकाचक)
आज शिवजयंती निमित्त औरंगाबाद येथील सुलक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी ग्रुप तर्फे आज औरंगाबाद शहरात एक आगळावेगळा उपक्रम व एक आगळीवेगळी शिवजयंती साजरी करण्यात आली.प्रथम क्रांती चौकामधील छत्रपती शिवाजी महाराज यांना माल्यार्पण करुन उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. गरीब निराधार बेवारस अशा मनोरुग्णांसाठी माणुसकी धर्म अजूनही जिवंत आहे हे तरुणांचे प्रेरणास्थान समाजसेवक सुमित पंडित यांनी आज दाखवुन दिले.आज दिनांक १९ रोजी शिवजयंती च्या पर्वावर भिकार्यांना ही जंटलमँन बनवण्याचा ध्यास मनी घेऊन हा उपक्रम कौतुक करण्यासारखा आहे. दरवर्षी शिवजयंती च्या दिनी वेगवेगळ्या ठिकाणी ही सुलक्ष्मी बहुद्देशियय सेवाभावी संस्था हे कार्य करत आहे.आज सकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसर या परिसरात असणाऱ्या बेवारस निराधार यांना जमा करून त्यांची दाढी कटिंग करून त्यांना आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून त्यांना माणूस बनवण्याचे कार्य सुमीतभाऊ करत आहे. सुमित भाऊ स्वतः गरीब निराधार नागरिकांना न्याय देण्यासाठी उपस्थित होते.
त्यावेळीस.पोलिस.निरक्षक संजय बनसोडे.विशाल टिंप्रवार.भरतभाऊ कल्याणकार.ज्यूनिअर चार्ली सोमनाथ स्वभावने.समाजसेविका पुजा पंडीत.त्यावेळी माणुसकी समुह जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर.वाघोदा येथील पत्रकार कमलाकर माळी चेतन पाटील. हे उपस्थित होते.व सहकार्य केले..
प्रतिक्रिया…..
महाराष्ट्रातील बेवारस निराधार अवस्थेत फिरणाऱ्या भिकाऱ्याला दहा रुपये भेट देणे बंद करा यांचे घर कुठे चुकले त्यांना कामाला लावा त्यांच्या घरी नेऊन त्यांना आई-वडील आहेत का विचारपूस चौकशी करून त्यांच्या घरच्यांकडे स्वाधीन करा त्यांची दाढी कटिंग स्वच्छ आंघोळ करून त्यांना कामाला लावा हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रभर चालू झालेला आहे आतापर्यंत महाराष्ट्र मध्ये साखरेपेक्षा जास्त बेवारस निराधारांना माणुसकी ग्रुप न्याय दिलेला आहे आणि जो पर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे कार्य अविरतपणे चालू ठेवणार आहे जसे की दूनिया मे आकर कमाया खूप हिरे क्या मोती मगर कफन को जेब नही होती हे सुमित यांचे वाक्य साध्य ठरताना दिसते जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा या उक्तीप्रमाणे ते संपूर्ण महाराष्ट्रभर आपले कार्य करीत आहे..।