शेतीसाठी व पिण्यासाठी नाही पाणी म्हणून भोले महाकाल फाउंडेशन मंत्रालयावर निघाले अनवाणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२३
जल ही जिवन है असे म्हटले जाते पाण्याशिवाय शेती तसेच मानवाचे जिवन मातीमोल आहे. असे म्हटले जाते असे असले तरी जळगाव जिल्ह्यातील बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेला पहिली प्रशासकीय मान्यता १९९९ मध्ये मिळाली असून सुद्धा आज २२ वर्ष उलटूनही ही योजना आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. या योजनेमध्ये बोदवड, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर, माताळा या पाच तालुक्यांचा समावेश असून या पाच तालुक्यातील ४२४२० हेक्टर म्हणजेच १०६०५० एकर शेत जमीन सिंचनाखाली येणार असून यामुळे हजारो शेतकऱ्यांना शेतीसाठी व पाच तालुक्यातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. परंतु या योजनेचे घोडं कुठे अडलय हे अद्यापही न उलगडणारे कोडे आहे. म्हणून शासनाला जागे करण्यासाठी भोले महाकाल फाउंडेशन तर्फे बोदवड ते मुंबई मंत्रालय असे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
या योजनेमध्ये तापी, पूर्णा, नदीचे वाहून जाणारे पाणी लिफ्टद्वारे पाईपलाईन ने साठवण तलावात टाकण्यात येणार आहे. यासाठी दोन ठिकाणी साठवण तलाव बनवण्यात येत आहे. टप्पा क्रमांक एक आमदगाव येथे तलाव बनवण्यात येनार आहे. आणि टप्पा क्रमांक दोन लोनवाडी जामठी येथे तलाव बनवण्यात येणार आहे. आणि या तलावातून शेतांमध्ये ते पाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशी ही योजना जर लवकरात लवकर पूर्ण झाली तर या लाभ क्षेत्रात येणारे शेतकरी सुजलाम सुफलाम होतील व त्यांचे जीवनमान उंचावेल आणि त्यांना आलेली आर्थिक टंचाई दूर होऊन त्यांना जीवन जगण्याचा खरा आनंद अनुभवास येईल म्हणून ही योजना पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.
त्यासाठी भोले महाकाल फाउंडेशन मार्फत बोदवड ते मंत्रालय पायी यात्रा काढून शेतकऱ्यांच्या सह्याचे निवेदन माननीय नामदार मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब यांना देण्यासाठी एक जानेवारीला सकाळी साडेसहा वाजता श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक बोदवड येथून मुंबईसाठी रवाना झाली असून आज दिनांक ०२ जानेवारी २०२३ सोमवार रोजी अंबे वडगाव येथे मुक्कामाला असून उद्या सकाळी पाचोरा मार्गे मुंबईकडे रवाना होणार असून बोदवड परिसर उपसा सिंचन योजना पुर्णत्वास नेण्यासाठी आपणही पाठिंबा देण्यासाठी आमच्यासोबत एक पाऊल पुढे येऊन आम्हाला आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन भोले महाकाल फाउंडेशन मार्फत करण्यात आले आहे.