शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील औरंगाबाद खंडपीठात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०२/२०२३
कापूस पिक म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच पांढर सोन व हेच कापूस पिक घेण्यासाठी शेतकरी हाडाच पाणी करुन रात्रंदिवस राबून जीवापाड मेहनत करुन कापूस पिकवत असतो व कापसाचे चांगल्या प्रकारे उत्पन्न काढून चांगला भाव मिळेल अशी आशा बाळगतो व त्याच्या भरवश्यावर स्वप्नांचे बंगले बांधून जगत असतो परंतु एका बाजूला हातात पिक आल्यावर दुसरीकडे शासन भांडवलशाहीच्या दबावाखाली येऊन जेव्हा शेतकरी विरोधी धोरणांचा अवलंब करून आपल्या देशात भरपूर कापूस उपलब्ध असतांनाच ११% टॅक्स माफ करुन ऑस्ट्रेलियातून तीन लाख कापसाच्या गाठी आयात करते ही मोठी शोकांतिका आहे असेच म्हणावे लागेल.
कारण केंद्र सरकारने बाहेर देशातून कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे बाजारपेठेत कापूस व्यापाऱ्यांना कापूस खरेदीची गरज नसल्याने आज महाराष्ट्रात कापसाच्या भावात कमालीची घसरण झाल्याने कापसाची मातीमोल भावाने खरेदी केली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांनी महागडी बी, बियाणे, खते, कीटकनाशके, शेती मशागत हा झालेला खर्चही निघणार नसल्यामुळे तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषिमंत्र्यांनी, उत्पादन खर्चात वाढ झाल्याने आपले हिवाळी अधिवेशन दरम्यान कापसाला १२,३००/- व सोयाबीनला ८७००/- प्रती क्विंटल इतका हमीभाव करावा म्हणून केंद्राला पत्र देखील लिहीले होते. म्हणून केंद्र सरकार या पत्राचा विचार करुन आज ना उद्या कापसाचे भाव वाढतील या आशेवर शेतू बसला असल्याने तो आपला कापूस विकायला तयार नाही.
या सगळ्या परिस्थितीवर तोडगा काढून शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने शेतीमालाला चांगला व हमीभाव वाढवून मिळावा म्हणून आपल्या कृषिमंत्र्यांनी केंद्राला लिहीलेले पत्र व यातून कोणताही मार्ग निघत नसल्याने या दोघांचा संदर्भ डोळ्यासमोर घेऊन सदरील दोन्ही विषयामुळे पाचोरा तालुक्यातील भातखंडे येथील सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पाटील यांनी व्यथित होऊन शेतकऱ्यांना या कापूस कोंडीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून दि. ०३/०२/२०२३ रोजी PILST / ३६१४ / २०२३ या स्टॅम्पने शासनाच्या चुकीच्या धोरणाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे.
तसेच मी शेतकऱ्यांच्या हितासाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. माझा न्यायदेवतेवर संपूर्ण विश्वास असल्याने माझ्या लढ्याला व शेतकऱ्यांना न्यायदेवतेकडून लवकरच न्याय मिळेल अशी आशा असल्याने आपण कापसाचे भाव वाढतील यासाठी आजपावेतो थांबले आहोत अजून काही दिवस कापूस न विकता थांबले तर नक्कीच न्यायदेवता आपल्या बाजूने न्याय देईल व आपल्या कापसाला चांगला भाव मिळेल म्हणून कोणीही कापूस विकण्यासाठी घाई खरु नये अशी विनंती केली आहे.