कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आक्षेपार्ह टेटस व अफवांवर विश्वास ठेऊ नका, अन्यथा कडक कारवाई पो. नि. राहुलजी खताळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/०६/२०२३
सद्यस्थितीत काही समाजकंटक व विध्न संतोषी लोक व्हॉट्सॲप, फेसबुक व इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावरून दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त संदेश टाकून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी व अशांतता परसवण्याचा प्रयत्न करत आहेत. याची दखल घेऊन पोलीस विभाग सतर्क झाला असून सोशल मीडियावर करडी नजर ठेवून अशा पोस्ट टाकणारांकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
म्हणून अशा तेढ निर्माण करण्यासाठी टाकण्यात आलेल्या सोशल मीडियावरील पोस्ट पुढे फॉरवर्ड करु नये तसेच आशा पोस्ट टाकू नये व अश्या पोस्टवर कुणीही विश्वास ठेऊ नये असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. राहुलजी खताळ साहेब यांनी केले असून पोलीस विभाग व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवून आहेत. जर अशा पोस्ट टाकतांना कुणी आढळून त्याच्यावर व ग्रुप ॲडमिनवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.