शेतकऱ्यांच्या हितासाठी पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची वज्रमूठ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०४/२०२३
पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात मतदारांशी संवाद साधुन मतदारांची मते जाणून घेत आपण पाचोरा, भडगाव या दोन्ही तालुक्याच्या बाजार समित्या वाचवण्यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी काय उपाययोजना करणार आहोत व काय करणे गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या पॅनल प्रमुखांनी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब प्रदिप पवार, राष्ट्रवादीचे मीजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, राष्ट्रीय काँग्रेसचे मा. श्री. सचिन दादा सोमवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत काल दिनांक १५ एप्रिल २०२३ शनिवार रोजी सकाळी अकरा वाजता भडगाव रोडवरील बोहरा फार्म हाऊसवर मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व शिंदे परिवाराच्या कारनाम्याचा पाढा वाचून आमदारांनी सत्तेवर राहून सुद्धा पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उन्नतीसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत शेतकरी हिताचे निर्णय न घेता कृषी उत्पन्न बाजार समितीवर असलेले कर्ज फेडण्यासाठी फेडण्यासाठी प्रयत्न न करता दुर्लक्ष केल्याचा आरोप मा. श्री. सचिन दादा सोमवंशी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. तसेच शिंदे परिवाराने सत्तेचा दुरुपयोग करत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हिताचे गाजर दाखवून करोडो रुपये किंमतीच्या जागा कवडीमोल भावात विकून एकप्रकारे (भुखंडाचे श्रीखंड) खाऊन म्हणजे जागा कश्या हडप केल्या तसेच आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील व सतीश शिंदे यांचे अनेक कारणामे सांगून केलेल्या भ्रष्टाचाराबाबत माहिती देत राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बाबासाहेब प्रदिप पवार यांनी खरपूस समाचार घेतला.
कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकरी, संचालक मंडळ व व्यापाऱ्यांचा हा एक त्रिवेणी (त्रिसूत्री) संगम आहे. हा मुद्दा लक्षात घेऊन शेतकरी हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कणा (केंद्रबिंदू) आहे म्हणून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी निर्मल सीड्सच्या माध्यमातून आभ्यासू कृषी तज्ञाऊ अनेक उपक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी सतत झटणारे व जनहितार्थ आपल आयुष्य पणाला लावणारे स्वर्गीय तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांचा वारसा पुढे नेण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळालाच पाहिजे तसेच बाजार समितीमध्ये शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना निवारा, पिण्यासाठी शुद्ध पाणी, शौचालये व इतर सुविधा देत शेतमालाची खरेदी, विक्री वेळेवर कशी कशी होईल यासह शेतकरी हितासाठी प्राधान्य देत व्यापारी, हमाल, मापाडी यांच्या समस्या समजून घेत ज्या हमाल, मापाड्यांच्या मेहनतीवर ही बाजार समिती चालते म्हणून त्यांना त्यांच्या घामाचा पुरेपूर मोबदला व मार्केट यार्डात आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. तसेच असे आश्वासन देत मतदारांनी कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता भविष्याचा विचार करुन आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून देत एक हाती सत्ता देऊन तुमच्या सेवेची संधी द्यावी अशी विनंती उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित मतदारांना केली.
ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था, पंचायत समिती, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा यापैकी कोणत्याही निवडणूका लागल्या म्हणजे सगळ्यांची नजर माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्या भूमिकेवर असते असे सांगत मा. श्री. दिलीप वाघ यांनी भाषणाला आपल्या शैलीत सुरवात केली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत विद्यमान आमदारांच्या सोबत जागा वाटपाबाबत समाधानकारक चर्चा न झाल्याने स्वहित बाजूला ठेवून आम्ही वेगळा मार्ग निवडला व पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती वाचवण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेना यांच्यासोबत एकत्र येऊन चोरांच्या व भ्रष्टाचारींच्या हातात सत्ता जाऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात वज्रमूठ घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत याकरिता मतदारांनी कोणत्याही भुलथापांना बळी न पडता आमच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून देत एकहाती सत्ता देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी असे आवाहन करत मागील काळात आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले होते की मी मार्केट कमिटीची एक इंचही जागा विकू देणार नाही. आम्हीही तेच म्हणतो की एक इंचही जागा विकल्या जाणार नाहीत असे असल्यावरही कोणत्याही प्रकारची शेती न करणारे काळ्या मातीशी कोणताही संबंध नसलेल्या व आता भाजपचे नेते मी मार्केट कमिटीची एक इंचही जागा विकत घेणार नाही असे म्हणत करोडो रुपयांची मालमत्ता कवडीमोल भावाने विकत घेणारे शिंदे निवडणुकीत उतरले आहेत म्हणून विचारपूर्वक मतदान करा म्हणजे शेतकऱ्यांची मार्केट कमिटी वाचेल असे सांगून मार्केट कमिटी टिकवायची असेल आणि विकसित करण्यासाठी स्व. सहकार महर्षि सुपडू आणा पाटील, गुलाबराव पवार, के. एम. बापू पाटील, ओंकार आप्पा वाघ, आर. ओ. तात्या पाटील यांच्या शेतकरी हितांचे धोरणे पुढे नेण्यासाठी महाविकास आघाडी पॅनलकडे एकहाती सत्ता देण्याचे आवाहन श्री. वाघ यांनी केले.
या मेळाव्याला व्यासपीठावर उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पाचोरा तालुका संपर्क प्रमुख सुनील पाटील, पी. टी. सी. चेअरमन संजय वाघ, बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब देशमुख, मोहन पाटील, एन. सी. पाटील, जयवंत पाटील रा. कॉ. महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, सौ. संगीता नेले, सौ. योजनाताई पाटील, उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सौ. तिलोत्तमा मौर्य, युवती जिल्हाध्यक्षा अभिलाषा रोकडे, खलिल देशमुख, रा. कॉ. जिल्हा उपाध्यक्ष, शालिग्राम मालकर, भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, श्याम भोसले, प्रशांत पवार, कार्याध्यक्ष हर्षल पाटील, शेतकरी सेनेचे अरुण पाटील, रमेश बाफना, माजी उपजिल्हा प्रमुख ऍड. अभय पाटील, माजी जि. प. सदस्य दिपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, ललित वाघ, तालुकाप्रमुख शरद पाटील, रा. काँ. तालुका अध्यक्ष विकास पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी, रा. काँ. शहराध्यक्ष अझहर खान, भूषण वाघ, ऍड. प्रवीण पाटील, ऍड. अविनाश सुतार, अशोक चौधरी, सुदाम वाघ, रेखा पाटील, ऍड. मनीषा पवार, प्रमिला सोमवंशी, सुप्रिया सोमवंशी यांची उपस्थिती होती.