पाचोरा येथील रेल्वे समस्याबाबत काँग्रेसतर्फे रेल्वे मंत्र्यांना साकडे .
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/०१/२०२२
पाचोरा जंक्शन रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा तसेच (पी.जे) पाचोरा ते जामनेर रेल्वे त्वरीत सुरू करण्याच्या मागणीसह विविध समस्यांचे निवेदन पाचोरा काँग्रेसकडून रेल्वे मंत्र्यांना देण्यात आले.
पाचोरा हे जंक्शन स्टेशन असुन पाचोरा येथे मोठी बाजारपेठ तसेच धान्य मार्केट असल्याने मालधक्क्याचे माध्यमातून रेल्वे प्रशासनाला भरपूर उत्पन्न मीळत असल्यावरही रेल्वे प्रशासनाकडून प्रवासी वर्गासाठीच्या गाड्यांना थांबा देण्यासाठी सकारत्मक नसून इतर बऱ्याच सुविधा उपलब्ध नाहीत. म्हणून याबाबतीत लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे राज्यमंत्री नामदार मा.श्री. रावसाहेब दानवे यांना निवेद देण्यात आले. यावेळी अल्पसंख्यक जिल्हा सचिव इरफान मनियार, अमजद मौलाना, रवी पाथरवट उपस्थित होते.
या निवेदनात पाचोरा जंक्शन स्टेशन असुन पाचोरा ते जामनेर (पी.जे.) ही ब्रिटिशकालीन रेल्वे इतिहासाची साक्ष देणारी तसेच ग्रामीण जनतेच्या दैनंदिन जीवनात महत्वाची तसेच दोन तालुक्यातील माणसामाणसात जिव्हाळा निर्माण करणारी गाडी आहे. परंतु ही रेल्वे कोरोनाच्या नावाखाली बंद केली असून ती तातडीने सुरू करावी अशी मागणी केली आहे.
तसेच पाचोरा सह सोयगाव, पारोळा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यातील जनतेला महत्त्वाचे कामासाठी तसेच चांगले उपचारासाठी मुंबई, नागपूर व इतर मोठ्या शहरात जावे लागते तसेच पाचोरा येथून पाचोरा शहरातील व पाचोरा, भडगाव, जामनेर तालुक्यातील विद्यार्थीही शिक्षणासाठी तसेच नोकरीच्या शोधात मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतात म्हणून विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बॅग्लोर अहमदाबाद एक्सप्रेस, ओकाया रामेश्वर एक्सप्रेस, जबलपुर मुंबई गरीब रथ, पंजाब मेल यांना थांबा देण्यात यावा यासह भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ देवलाली शटल सुरू करुन अप-डाउन करणार्यांना तात्काळ मासिक व त्रमासिक पास उपलब्ध करुन द्यावी. तसेच बनोटी ते पाचोरा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे यासाठी संबंधित विभागांना शिफारस करण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस ने केंद्रीय राज्यमंत्री ना. रावसाहेब दानवे यांना बनोटी येथे दौरा असतांना हे निवेदन देण्यात आल्याने ना. दानवे यांनी कॉंग्रेस पदाधिकारींच्या समस्या जाणून घेत त्यांच्या तळमळीबाबत त्यांचे कौतुक केले.