वडगाव आंबे ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट, सुविधांअभावी ग्रामस्थांची होतेय घुसमट. ग्रामसभा घेण्यात यावी ग्रामस्थांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/०८/२०२३
वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीव सद्यस्थितीत प्रशासकीय राजवट असून प्रशासकीय अधिकारी मा. श्री. धस साहेब व ग्रामसेवक मा. श्री. म्हस्के हे कामकाज पहात आहेत. मात्र हे दररोज मुख्यालयात उपस्थित रहात नसल्याने ग्रामस्थांनी गावातील समस्या सोडविण्यासाठी कुणाकडे दादा मागावी हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
वडगाव आंबे गृप ग्रामपंचायतीमध्ये कोकडी तांडा, वडगाव जोगे व वडगाव आंबे या तीन गावांचा समावेश असून पैकी कोकडी तांडा व वडगाव जोगे ही गावे संपूर्ण बंजारा समाजातील बांधवांची वस्ती आहे. तर गावात सर्वधर्मीय लोक रहातात. परंतु या गृप ग्रामपंचायतीवर मागील पाच वर्षांपासून श्रीमत कलाबाई हरिभाऊ पाटील या लोकनियुक्त महिला सरपंच होत्या परंतु यांच्या प्रकृती चांगली नसल्याचे कारण पुढे करत ग्रामपंचायत सदस्यांनी आलटुन, पालटुन चार वर्ष प्रभारी सरपंच पदावर कामाकाज पाहिले होते.
आता प्रशासकीय अधिकारी कामकाज पहात असून ते नियमितपणे वडगाव आंबे ग्रामपंचायत कार्यालयात दिसून येत नाहीत. तसेच ग्रामसेवक कधी, कधी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित असले त्यांच्याकडे काही समस्या घेऊन गेल्यावर ते समाधानकारक उत्तर देत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात गावठी डुकरांची संख्या जास्त असल्याने ही डुकरे गावात व आसपासच्या शेत शिवारात धुमाकूळ घालत असून गावातील घरात घुसून तर शेतातील पिकात घुसून नुकसान करत आहेत.
तसेच वडगाव आंबे गावाचा सि. टी. सर्हे. झालेला आहे मात्र गावात दिवसेंदिवस अतिक्रमण वाढतच चालले असून रहदारीला अडथळा निर्माण झाला असून एखाद्यावेळी गावात रुग्णवाहिका आणण्याची वेळ पडल्यास त्यावेळी काय परिस्थिती निर्माण होईल हे सांगता येत नाही. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे अतिक्रमण इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे की पंधरा ऑगस्टच्या दिवशी गावातून प्रभातफेरी कशी काढायची हा प्रश्न शिक्षकांसमोर उभा राहिला होता.
याच सोबत महिलांची शौचालये, पावसाळी वातावरण असल्याने गावातील पावसाचे व सांडपाणी वाहून जात नसल्याने गावात ठिकठिकाणी चिखल व डबके तयार झाले आहेत. डासांचा उपद्रव वाढला आहे. नळांना पिण्याचे पाणी नियमितपणे येत असले तरी त्यात वेळोवेळी पावडर टाकणे गरजेचे आहे. तसेच गावातील पथदिवे नियमितपणे सुरु नसतात. अश्या बऱ्याचशा समस्या भेडसावत आहेत. मात्र प्रशासक अधिकारी व ग्रामसेवक हे नियमितपणे उपस्थित राहत नाहीत व राहिले तरी ते ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन घेत नाही किंवा त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत नसल्याने लवकरात, लवकर ग्रामसाभा घेण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.