सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • संस्थाचालकाचा पैसे कमावण्यावर डोळा, लोहारी गावात एकाच नावाच्या दोन शाळा.

  • बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ, जिल्हाधिकारी व वैद्यकीय विभागाकडून कारवाई अपेक्षित.

  • ब्लॅक आऊट व मॉक ड्रिलच्या कालावधीत डी. जे. व शारपी लाईटचा धिंगाणा, डिजे मालकांवर कठोर कारवाईची मागणी.

  • सार्वे प्र. लो. शिवारातुन पन्नास हजार रुपये किंमतीच्या बैलाची चोरी.

  • बिबट्याचा हल्ल्यात एक मजूर जखमी, अंबे वडगाव ते पाचोरा रस्त्याच्या कामावरील मजूरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.

आपलं जळगाव
Home›आपलं जळगाव›मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली – माजी मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप

मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली – माजी मंत्री गिरीश महाजन यांचा आरोप

By Satyajeet News
November 3, 2020
163
0
Share:
Post Views: 48
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन. (पाचोरा) पिक विम्याचे निकष राज्य सरकारने बदलले आहे. त्यामुळे राज्यातील विशेषत: जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. विम्या कंपन्यांचा फायदा व्हावा यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी विमा कंपन्यांशी हातमिळवणी केली असून मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे

केळी उत्पादक शेतकऱ्यांचा हक्क महाविकास आघाडी सरकारला द्यावाच लागेल – खासदार रक्षाताई खडसे

आज दिनांक 2 नोव्हेंबर रोजी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षाकरिता लागू केलेल्या केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई मध्ये बदल करून पूर्वी प्रमाणेच प्रमाणके लागू करणेबाबत निवेदन माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

याआधी खासदार रक्षाताई खडसे रावेर लोकसभा यांनी 10 निवेदने दिलेली असून सदर पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत कोणत्याही प्रकारचे बदल झालेले नाही, त्यामुळे समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असुन केळी पीक विमा काढण्याची मुदत सुद्धा संपलेली असुन समस्त शेतकरी संभ्रमात आहे. तसेच शासन निर्णय क्र.फवियो-२०२०/प्रक्र१३/१०ए दि.०५ जुन २०२० नुसार सन २०२०-२१ मधुन केळी पिक विमा योजनेचे प्रमाणके (ट्रिगर) व नुकसान भरपाई मध्ये केलेल्या बदलामुळे शेतकरी बांधावामध्ये नाराजीचे वातावरण तयार झालेले आहे.

पुर्वी सलग ३ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास २५००० रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ५-७ दिवस किमान ८ डिग्री सेल्सीअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राहिल्यास ९००० रु. देय आहे. दिनांक ०१ मे २०२० ते ३१ मे २०२० सलग ५ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास ४१००० रु. देय होते. नविन जि.आर. नुसार सलग ८ दिवस ४५ डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त गेल्यास १३५०० रु. देय आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काढलेला हा जि.आर. अन्यायकारक आहे.

दि. ०५ जुन २०२० रोजी लागू केलेली प्रमाणके ही कमी जादा तापमानात कधीही लागु होणार नाही आणि मागील सलग किमान ०५ वर्षाची तापमानाची आकडेवारी पाहता असे सलग कमी किंवा जादा तापमान कधीही दिसून आले नाही आज रोजी किमान २ ते ३ दिवस जरी तापमानात कमी जादा प्रमाणात बदल झाला तरीही केळी पिक पूर्णत: खराब होवुन जाते आणि केळी निसवणीवर गंभीर परिणाम होऊन उत्पादन कमी होते असे शेतकऱ्यांचे स्पष्ट मत आहे.

आज शेतकरी नैसर्गिक आपत्ती, बाजार भाव, आजार आणि स्थानिक समस्या यांनी ग्रासलेला असुन शेतकऱ्यांना अनावश्यक निकष लावुन नुकसान भरपाई न देणे ही बाब योग्य नाही. केळी पिक नुकसान भरपाई करिता लावलेले निकष आणि येणारे संभाव्य धोके यांच्या पासुन शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही.

सदर निकषात बदल करून पुर्वी प्रमाणेच सोबत दिलेल्या पिक विमा योजनेचे प्रमाणके आणि खर्च मर्यादा निकष ठेवावेत ही विनंती. तसेच ठिबक सिंचनसाठी केंद्र सरकारने १०० टक्के अनुदान राज्य सरकारला दिलेले आहे. त्यापैकी केवळ ५० टक्के अनुदान राज्य सरकारने दिले हे सुध्दा अन्यायकारक आहे. मागिल वर्षी जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पिक विमा योजनेअंतर्गत कापसाचे पैसे मिळालेले नाही.

वास्तविक पाहता केंद्र सरकारने आपला हिस्सा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. तसेच मागील वर्षी शेतकऱ्यांनी विमा काढलेला असून झालेल्या नुकसानाचे शासनामार्फत पंचनामे सुद्धा झालेले आहे, परंतु आज पर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही तसेच सदर पीक विमा योजनेचे निकष बदलणे बाबत हा जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांवर अन्याय आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही व्हावी व शेतकर्‍यांना पैसे मिळण्याची आपल्या मार्फत लेखी आश्वासन समस्त शेतकरी बांधवांना देण्यात यावे अशी आमची मागणी आहे.
या निवेदनाद्वारे भारतीय जनता पार्टी जळगांव समस्त केळी उत्पादक शेतकरी बांधवांच्या वतीने महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले की जर या निकषांमधे बदल केला गेला नाही तसेच पीक विमा काढण्याची मुदत वाढवून दिली नाही तर संवेधानीक मार्गाने जळगाव जिल्ह्यात आंदोलन उभे करावे लागेल शेतकर्‍यांच्या बाजुने भारतीय जनता पार्टी भक्कम पणाने उभी राहील. याप्रसंगी माजी मंत्री आ.गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष आ.राजूमामा भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रंजनाताई पाटील, खासदार रक्षाताई खडसे, खासदार उन्मेषदादा पाटील, आमदार चंदूभाई पटेल, आमदार मंगेश चव्हाण, जिप उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी सभापती पोपटतात्या भोळे, जिप सदस्य सविताताई भालेराव, जिप सदस्य नंदाताई सपकाळे, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंस सदस्य, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

पिंपळगाव हरेश्वर , चिंचपूरा शिवारातील बहुळा नदी ...

Next Article

मंत्र्यांनी स्वत:चा खिसा गरम करण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • आपलं जळगाव

    भडगाव येथे काटेकोरपणे पालन करत जनता कर्फू यशस्वी.

    March 20, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    स्वर्गीय आप्पासो माजी आमदार ओंकार नारायण वाघ यांची जयंती साजरी.

    May 13, 2021
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    सौ. वंदनाताई चौधरी यांनी घेतली ग्रामविकासमंत्री श्री. हसन मुश्रिफ यांची भेट

    November 7, 2020
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    राजकारणात कुणी मित्र किंवा दुश्मन नसतोः शिवसेनेचे प्रवक्ते ,राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील

    September 27, 2020
    By Satyajeet News
  • Uncategorizedआपलं जळगाव

    परराज्यातील कोंबड्यांची पाचोरा तालुक्यात विक्री.

    February 2, 2021
    By Satyajeet News
  • आपलं जळगाव

    तारखेडा उपकेंद्र बनले समस्यांचे माहेरघर, रुग्ण फिरत आहेत वाऱ्यावर,सत्यता जाणून घेण्यासाठी रणरणत्या उन्हात कॉंग्रेस पदाधिकारी धडकले.

    May 20, 2021
    By Satyajeet News

You may interested

  • आपलं जळगाव

    सुखदा पाटील यांना सावित्रीबाई फुले आदर्श महिला शिक्षक पुरस्कार जाहीर.

  • दिन विशेष

    येत्या ०५ फेब्रुवारीला आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी गुरु यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करावी, गोवर्धन जाधव यांचे आवाहन.

  • महाराष्ट्र

    [प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा दणका] पत्रकारांना अरेरावीची भाषा करणा-या अधिका-यांनी मागितली माफी .

दिनदर्शिका

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज