शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिपक राजपूत यांनी केली अपघातग्रस्तांना मदत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/१२/२०२२
आज दिनांक १६ डिसेंबर २०२२ शुक्रवार रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत हे कामानिमित्त जळगाव जात असतांना पाचोरा ते जळगाव रस्त्यावर रामदेव वाडी ते शिरसोली दरम्यान असलेल्या वनविभाग परिसरात एक अपघात झाल्याचे दिसून आले. हे दृश्य पाहून मा. श्री. दिपक भाऊ राजपूत त्याचे सुपुत्र चैतन्य राजपूत व वरखेडी येथील राकेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेचच १०८ नंबरवर फोन करुन ॲम्बुलन्स मागवली व अपघातग्रस्तांना धिर देत रस्त्यावरुन बाजूला केले.
अपघातग्रस्तांची परिस्थिती गंभीर असल्याचे लाक्षता आल्यानंतर त्यांच्यावर लवकरात, लवकर उपचार करणे गरजेचे असल्यामुळे मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी ॲम्बुलन्सची वाट न पाहता स्वताच्या गाडीतून जखमींना नेण्यासाठी तयारी सुरु केली व उपस्थितांच्या मदतीने जखमींना गाडीत बसवतील तेवढ्यातच घटनास्थळी ॲम्बुलन्स आल्यामुळे त्यांना ॲम्बुलन्स मध्ये जळगाव येथे पुढील उपचारासाठी रवाना केले.
उपचारासाठी पाठवतांना ॲम्बुलन्स चालकाला स्वताचा भ्रमणध्वनी क्रमांक देत काहीही अडिअडचणी आल्यास मला फोन करा मी जळगाव येथेच येत आहे असे सांगून शक्य ती मदत करण्यासाठीचे आश्वासन दिले हा अपघात घडताच क्षणी दिपक भाऊ राजपूत, चैतन्य राजपूत व राकेश पाटील यांनी हातचे काम सोडून अपघातग्रस्तांना उपचारासाठी तातडीने जळगाव येथील दवाखान्यात पाठवल्यामुळे पुढील अनर्थ टळला असेच म्हणावे लागेल थोडक्यात काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून देवदूत बनून दिपक भाऊ राजपूत यांनी आम्हाला जीवदान दिले अशी प्रतिक्रिया अपघातग्रस्त महिलेने दिली.