शेंदुर्णी येथील माजी नगरसेवक शरद बारी यांची बलात्काराच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०५/२०२४
कुत्र्याला गती व माणसाला प्रगती सहन होत नाही असे म्हणतात असाच काहीसा अनुभव समाजात वावरतांना येत असतो व याच विकृत प्रवृत्तीच्या लोकांमुळे बऱ्याचशा निष्पाप लोकांना नको त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे उघडकीस आली आहे. परंतु न्याय व्यवस्थेने न्यायनिवाडा करतांना दुध का दुध व पाणी का पाणी करुन शेंदुर्णी नगरीतील सच्चा समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या एका तरुणाची बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करून सादर तरुणाला जीवदान दिले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील समाजसेवक भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या माजी नगरसेवक शरद बाबुराव बिरी यांच्या विरोधात एका महिलेच्या फिर्यादीवरुन दिनांक २१ मे २०२३ रोजी पहुर पोलीस स्टेशनला ३७६, ४५२, ४४८, ५०६ या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद बिरी यांना पहुर पोलीसांनी त्वरित अटक केली होती. अटक झाल्यानंतर काही महिन्यांनंतर शरद बारी यांना मा. न्यायालयात जामीन मंजूर झाल्याने त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती.
याच कालावधीत पहुर पोलीसांनी सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण करुन शरद बारी यांच्याविरोधात दिनांक ०५ जुलै २०२३ रोजी जळगाव सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तदनंतर लागलीच सत्र न्यायालयात खटल्याच्या न्यायालयीन चौकशीचे काम कामकाज सुरु झाले या चौकशीअंती सरकारी पक्षातर्फे मुळ फिर्यादी, फिर्यादीचा पती, पहुर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असे साक्षीदार तपासले या वेळी संशयित आरोपीचे वकील ॲड. श्रीकृष्ण विजयकुमार दैवतवाल यांनी उलटतपासणी केल्यानंतर मा. न्यायालयाने दोघेही पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व शेंदुर्णी नगरीचे माजी नगरसेवक शरद बारी यांची निर्दोष मुक्तता केली आहे.
“भाजपचे कार्यकर्ते व शेंदुर्णी नगरीचे नगरसेवक शरद बारी”
मी कोणताही गुन्हा केलेला नसतांनाही काही समाजकंटकांनी मिळून माझ्याविरुद्ध कटकारस्थान करुन मला खोट्या गुन्ह्यात अडकवले होते. परंतु माझा देवावर व न्यायदेवतेवर विश्वास होता व आहे मला मा. न्यायालयात न्याय देवतेने न्याय मिळवून दिला एकप्रकारे मला पुनर्जीवन दिले आहे. माझ्यावर खोटा गुन्हा दाखल झाल्यानंतर मला, माझ्या परिवाराला अत्यंत बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले त्याकाळात आम्हाला बदनामी सह मानसिक ताण सहन करावा लागला परंतु माझ्यामागे माझा परिवार, माझी मित्रमंडळी व हितचिंतकांनी मला भरभरुन साथ दिली म्हणून मला मानसिक बळ मिळाले व ही लढाई मी लढू शकलो परंतु समाजातील अशा वाईट प्रवृत्तींना उघडे पाडण्यासाठी मी न्यायालयात लढणार असल्याचे मत शरद बारी यांनी सत्यजित न्यूज कडे बोलतांना व्यक्त केले आहे.