सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • अनफिट, नादुरुस्त स्कूलबसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात, प्रादेशिक महामंडळाकडून कारवाई अपेक्षित.

  • कायद्याची राहिली नाही भीती, गोळीबार करणाऱ्या आरोपींची जामनेर पोलीसांकडे शरणागती.

  • पाचोरा बसस्थानक गोळीबारातील जखमी आकाश मोरेचा जागीच मृत्यू.

  • पाचोरा बसस्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार, एक गंभीर जखमी.

  • पिंपळगाव हरेश्वर येथे स्कूलबस व दुचाकीचा अपघात, दुचाकीस्वार गंभीर जखमी.

राजकीय
Home›राजकीय›अधिकारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसतील,तर सर्वसामान्य जनतेची काय कथा ? संतोष पाटील अंबे वडगाव.

अधिकारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसतील,तर सर्वसामान्य जनतेची काय कथा ? संतोष पाटील अंबे वडगाव.

By Satyajeet News
August 21, 2021
693
0
Share:
Post Views: 43
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/०८/२०२१

अंबे वडगाव येथील मा.श्री. संतोष पाटील यांचे सत्ताधारी व नोकरशाही याबद्दल लिहिलेले विचार वाचण्यात आले. हे वाचल्यावर मनात एकच शंका येते की आपल्या भारत देशात लोकशाही आहे की नोकरशाही कारण या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इतका माज आला आहे की ते सत्ता आमच्याच बापाची असे समजून वागतात.

सर्वसामान्य माणूस जेव्हा एखाद्या कार्यालयात जातो तेव्हा ती त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरते तसेच बरेचसे अधिकारी, कर्मचारी पंख्याच्या हवेत मोबाईलवर मग्न असतात. संबंधित व्यक्तीला पाहिजे ती माहिती दिली जात नाही. शासनाकडून मिळणाऱ्या सवलती, योजना याविषयीची माहिती व मार्गदर्शन न करता अरेरावी केली जाते.

पाचोरा पंचायत समिती व इतर कार्यालयात पंटर ठेऊन लाच (भाड) खाऊन कामे केली जातात. थेट नियमानुसार कोणत्याही योजना मिळत नाहीत. ज्या कागदावर वजन नसेल ती कागद उडून जातात असे बरेचसे अनुभव आहेत. बऱ्याचशा योजना कागदोपत्री राबविण्यात आल्या आहेत. आजही तालुक्यातील हजारो शौचालये, शेकडो घरकुल, शेततळे, अनुदानित विहिरी, ट्रँक्टर, दुभती जनावरे, गोठाशेड फक्त कागदोपत्री दाखवून मलिदा लुटला आहे.

दुसरीकडे तालुक्यातील गावागावात सट्टा, पत्ता, जुगार, देशी व गावठीदारु हे अवैधधंदे राजरोसपणे सुरु आहेत. गावागावात, घराघरात या अवैधधंद्यांमुळे अशांतता पसरली असून घराघरातील व गावातील शांतता भंग झाली असून दररोज भांडण, तंटे होत आहेत. यातूनच महिलांचा छळ, आत्महत्या, काडीमोड अश्या घटना घडत आहेत. अवैधधंद्याचे विरोधात आवाज उठवणारांवर बऱ्यापैकी खोटे गुन्हे व धाक, दडपशाही होतांना दिसून येते.

या अवैधधंदे करणारांपैकी काहींना राजश्रय मिळतो तर काही हप्तेखोरीवर हे अवैधधंदे राजरोसपणे चालवतांना दिसून येतात. या अवैधधंद्यांमुळे व्यसनाच्या आहारी गेलेले लोक घरातील अन्नधान्य, संसारपयोगी वस्तू विकून व्यसनपुर्ती करतात अश्या बऱ्याचशा तक्रारी आहेत.विशेष म्हणजे अल्पवयीन व तरुणवर्ग व्यसनाच्या आहारी गेला आहे.

इतका नंगानाच सुरु असतांहि सत्ताधारी व विरोधक समाजहिताचे भांडवल करुन राजकारण करतांना या विषयाकडे दुर्लक्ष करतात यावरून मनात शंका येते की हे सत्ताधारी व विरोधक फक्त आणि फक्त जनतेच्या भावनांशी खेळुन उंदीर, मांजराचा खेळ दावतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अश्याच एका विषयावर मत मांडले आहे. अंबे वडगाव येथील लेखणीचे शिलेदार मा.श्री. संतोष पाटील यांनी.

■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
मित्रहो आपण आतापर्यंत फक्त सरकार बदलले मात्र व्यवस्था तशीच राहिली या मुजोर व्यवस्थेतील लोक अधिकारी-कर्मचारी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नाहीत, या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या विरोधात आंदोलन करावं लागत, उपोषणाला बसाव लागत, याहून दुसरे दुर्दैव काय असेल. काल पाचोरा येथे ज्येष्ठ विधीतज्ञ मा.श्री. अभय दादा हे पंचायत समितीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी साठी उपोषणाला बसले होते. संबंधित अधिकाऱ्यांची व झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी म्हणून वारंवार तक्रारी करूनही काही उपयोग नसल्याने संविधानिक मार्गाने मा.श्री. अभय पाटलांचे उपोषण सुरू होते.

तालुक्यातील अनेक संघटना पदाधिकारी व नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता. मीही उपोषणस्थळी जाऊन पाठिंबा दिला होता. उपोषण पाच दिवस सुरू होते. नंतर आमदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून योग्य असा तोडगा काढून उपोषण सोडवले, मात्र ‘विषय इथेच थांबत नाही’ किंवा प्रश्न सुटत नाहीत. असं का होतय सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांना सेवेतील अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलने करून उपोषणाला बसण्याची वेळ येते ही लोकशाहीच्या दृष्टिकोनातून खेदाची बाब आहे.

मागे ही स्वताहा आमदार साहेबांना आंदोलन करावं लागलं होतं आपली सत्ता असून हे अधिकारी ऐकत नसतील तर याला काय समजावे अश्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी दुसरा अधिकारी नेमला जातो पहिला आणि दुसरा अधिकारी एकाच ताटातील मांजर असतात. खरं म्हणजे या प्रशासनातील अधिकाऱ्यांना कुठला माज आहे हे कुणाचेही ऐकत नाहीत म्हणून यांच्या विरोधामध्ये सत्तेतल्या, विरोधातल्या सर्व लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

हे अधिकारी नसून आपले सेवेकरी आहेत हे सामान्य जनतेला समजले पाहिजे. प्रत्येकाने यांचे विरोधात बोललो पाहिजे. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळत नाही म्हणून ‘आपण आता बोललं पाहिजे’ ‘दिल्लीचा तख्त हल्ला पाहिजे’ या मुजोर व्यवस्थेला उभ्यान कोल्ल पाहीजे,
यांच्या चौकशा झाल्या पाहिजे, दोषी असतील त्यांना शिक्षा झाल्या पाहिजे, गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना पैसे घेऊन मुठभर लोकांच्या घशात घालणारी ही अधिकाऱ्यांची टोळी उधळून लावली पाहिजे.

सामान्य माणूस जर अधिकाऱ्यांच्या विरोधात म्हणण्यापेक्षा (आपल्या हक्कासाठी व न्याय मिळण्यासाठी) बोलला तर लगेच कलम (३५३) चा धाक दाखवला जातो व त्याचा आवाज दाबला जातो. मात्र अधिकाऱ्याने काम केलं नाही तर सेवा हमी कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही ही खेदाची बाब आहे. म्हणून सेवा हमी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जात नाही. किंवा आतापर्यंत असा एकही गुन्हा तालुक्यामध्ये नोंद झालेला नाही.

काल उपोषण सोडते वेळी माननीय आमदार साहेब आजी-माजी पंचायत समितीचे सभापती व इतर मान्यवर उपस्थित होते. सर्वांचा एकच सुर होता की अधिकारी ऐकत नाही अधिकारी का ऐकत नाही याचा अभ्यास करून त्यामागे कुठल्या अदृष्य शक्ती आहे याचा शोध घेतला पाहिजे व दोषींना शिक्षा झालीच पाहिजे गोरगरिबांच्या कल्याणकारी योजना हे भ्रष्ट अधिकारी पदाधिकारी स्वतःच्या घशात घालत असतील तर त्यांना रस्त्यावर अडवून जाब विचारला पाहिजे आणि ते करण्यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे तरच आपल्याला न्याय मिळेल नाहीतर कागदाचे घोडे कागदावरच राहतील.

संतोष पाटील.
7666447112

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

जेष्ठ शिक्षक बी. एन. पाटील. (पत्रकार) यांची ...

Next Article

गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस महिला ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • राजकीय

    वरसाडे ग्रामपंचायत निवड बिनविरोध अमोल शिंदे यांच्या प्रयत्नाला यश.

    December 31, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    सात मार्च सोमवार रोजी पाचोरा येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

    March 5, 2022
    By Satyajeet News
  • Uncategorizedराजकीय

    पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांनी घेतली विकासकामांची शपथ राज्यातील पहिला आगळावेगळा उपक्रम.

    February 13, 2021
    By Satyajeet News
  • राजकीय

    आमदार किशोर आप्पा पाटील यांना तिसऱ्यांदा संधी, उद्या भरणार उमेदवारी अर्ज.

    October 23, 2024
    By Satyajeet News
  • राजकीय

    उमेदवारी दाखल करतांना लागणारे कागदपत्रांची महिती.

    December 22, 2020
    By Satyajeet News
  • राजकीय

    जीवन साहेबराव पाटील हे जारगाव गणातून भाजपातर्फे उमेदवारी लढवणार.

    August 2, 2022
    By Satyajeet News

You may interested

  • शैक्षणिक

    अबॅकस स्पर्धेत पाचोऱ्याच्या श्री समर्थ प्रोऍक्टिव्ह अबॅकस आणि वेदिक मॅथ क्लासचे घवघवीत यश;१९ विद्यार्थी ठरले ट्रॉफी विनर.

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा शहरासह तालुक्यात प्लॅस्टिक कोटेड पेपर कपचा बिनदिक्कत वापर नागरिकांचे आरोग्य धोक्यात.

  • शासकीय योजना

    राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा निमित्ताने पाचोरा पुरवठा विभागाकडून रेशनकार्ड वाटप.

दिनदर्शिका

July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज