सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›मतदान–मतमोजणीतील अंतरामुळे ईव्हीएमवरील संशय अधिक गडद.

मतदान–मतमोजणीतील अंतरामुळे ईव्हीएमवरील संशय अधिक गडद.

By Satyajeet News
December 2, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२५

ईव्हीएम संदर्भातील शंका अधिक तीव्र होण्यामागे मतदान आणि मतमोजणीदरम्यान असलेला तब्बल १८ दिवसांचा कालावधी हे महत्त्वाचे कारण असल्याचे जनमानसातून व्यक्त केले जात आहे. “इतका दीर्घ कालावधी असताना ईव्हीएममध्ये हेराफेरी होऊ शकते,” अशी भीती अनेक सुज्ञ नागरिक व्यक्त करत असून, त्यातूनच बॅटरी वेगळी ठेवण्याची मागणी अधिक जोर धरत आहे.

नागरिकांचे म्हणणे आहे की मतदानाच्या दिवशी स्थानिक पातळीवर दिसणारे मतदानाचे चित्र आणि निकालाच्या दिवशी समोर येणारे आकडे यामध्ये अनेकदा मोठी तफावत जाणवते. “गावपातळीवर, प्रभागनिहाय किंवा बूथनिहाय झालेली चर्चा, मतदानाचा कल आणि प्रत्यक्ष निकाल यांत मेळ बसत नाही,” अशी भावना मतदारांमध्ये वाढीस लागत आहे. या विसंगतीमुळेच ईव्हीएम सुरक्षिततेबाबत संशय अधिक बळावत असल्याचे बोलले जात आहे.

विशेषतः मतदान झाल्यानंतर ईव्हीएम अनेक दिवस स्ट्राँगरूममध्ये ठेवली जात असल्याने त्या काळात नेमकी कोणती प्रक्रिया कशी पार पडते, याची पारदर्शक व सविस्तर माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार आहे. “मतदान आणि मतमोजणी यातील एवढ्या मोठ्या कालावधीत यंत्रे निष्क्रिय ठेवली गेली आहेत का, याची खात्री कशी द्यायची?” असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे.

त्यामुळेच, ईव्हीएम जमा करताना बॅटरी वेगळी ठेवणे आणि मतमोजणीच्या दिवशी अधिकाऱ्यांच्या तसेच सर्व पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ती पुन्हा जोडणे, ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे मत अधिक ठामपणे पुढे येत आहे. यामुळे संभाव्य हेराफेरीबाबतच्या शंकांना आळा बसेल आणि निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास पुन्हा दृढ होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

लोकशाही व्यवस्थेचा कणा असलेल्या निवडणुकीबाबत जर जनतेच्या मनात शंका राहिल्या, तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणूनच मतदान व मतमोजणीतील कालावधी, ईव्हीएमची सुरक्षितता आणि तांत्रिक प्रक्रियेबाबत स्पष्ट, पारदर्शक व विश्वासार्ह खुलासा होणे अत्यावश्यक आहे, अशी एकंदर जनभावना व्यक्त होत आहे.

कारण आजपर्यंत ऑनलाईन पद्धतीने बरेच घोटाळे झाले आहेत व दररोज होत आहेत. बॅंक अकांऊट खाली होणे, एटीएम फ्रॉड, नुकताच झालेला अनुदान घोटाळा असे बरेचसे ऑनलाईन पद्धतीने घोटाळे झाले आहेत मग हे का होऊ शकत नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 309
Previous Article

लोकशाही टिकवण्यासाठी लक्ष्मी नव्हे, सरस्वतीची आराधना हवी.

Next Article

जामनेर नगरपरिषद निवडणुकीत बोगस मतदानाचा भांडाफोड; दोन ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    आधार देऊन निराधार केले सरकारने; लाडक्या बहिणींचा संताप उफाळला.

    October 16, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात धनदांडग्या कडून अवैध उत्खनन करत लाखो रुपयांच्या गौण खनिजाची चोरी, महसूल विभाग कुंभकर्ण झोपेत.

    September 23, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    नंदी दुध व पाणी पितो म्हणून जळगाव जिल्ह्यात सगळीकडे महादेव मंदिरात तोबा गर्दी.

    March 5, 2022
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    राजकारण्यांचा रंगतोय कलगीतुरा; पत्रकारांच्या फुकटात येरझारा !

    October 19, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    महाराष्ट्रातील सर्व बहुजन समाजाच्या महापुरुषांचे जयंती उत्सव साजरे करण्यासाठी परवानगीची गरजच काय ? श्री . हरीभाऊ पाटील.

    February 10, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    कुऱ्हाड खुर्द येथून एक लाख रुपये किंमतीच्या बैलजोडीची चोरी.

    April 10, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedक्राईम जगत

    पोलीस निरीक्षक किरण शिंदेच्या धडक कारवाईने, महिलांच्या सुखी संसाऱ्याच्या आशा पल्लवीत.

  • ब्रेकिंग न्यूज

    भडगाव तालुक्यातील उमेदवाराच्या कार्यकर्त्यांची परिस्थिती म्हणजे लाखों की बाते वडा-पाव खाते.

  • ब्रेकिंग न्यूज

    पिंपळगाव हरेश्र्वर येथे १७ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज