शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार एकत्र – नागपुरात ऐतिहासिक शेतकरी एकता!
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/११/२०२५
“शेतकरी एकता झिंदाबाद!” या घोषणांनी गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र भरचा शेतकरी वर्ग पुन्हा एकदा एकजुटीचा नारा दिला आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या हक्कांसाठी बुलंद आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीचे शेतकरी नेते एकत्र आले आहेत.
३१ वर्षांनंतर नागपूरमध्ये पुन्हा उभारण्यात आलेली ही ऐतिहासिक एकजूट राज्यातील शेतकरी चळवळीला नवा आयाम देणारी ठरणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न केवळ चर्चेत न राहता प्रत्यक्षात सोडवले जावेत, या हेतूने मोठा जन आंदोलनाचा संकल्प करण्यात आला आहे.
या शेतकरी एकता परिषदेचा सन्मान सोहळा आणि विचारमंथन कार्यक्रम गुरुवार, ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता पत्रकार भवन, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.

या परिषदेत महाराष्ट्रातील प्रख्यात शेतकरी नेते, संघटनांचे पदाधिकारी, तसेच विविध कामगार आणि मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. “आता शेतकऱ्यांचे प्रश्न दडपून राहणार नाहीत, आवाज उठणार आणि हक्क मिळणार,” असा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.
आयोजक : राष्ट्रीय समाज पक्ष, महाराष्ट्र राज्य
शेतकरी, शेतमजूर आणि सर्व श्रमिक वर्गाच्या सन्मानासाठी आणि अधिकारांसाठी उभारण्यात आलेली ही एकजूट राज्यभरातील शेतकरी संघटनांना नवचैतन्य देणारी ठरणार आहे.
शेतकरी एकता झिंदाबाद! ✊
