खाजगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या जाचाला कंटाळून वरखेडी येथील २७ वर्षीय विवाहितेची आत्महत्या.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१३/०२/२०२५
सद्यस्थितीत महिलांच्या सुरक्षेसाठी कितीही कठोर कायदे करण्यात आले असले तरी ज्यांच्या हातात कायद्यांचे सुदर्शन चक्र आहे यापैकी बरेचसे अधिकारी व कर्मचारी पैसा कमावण्याच्या नादात पदाचा गैरवापर करुन कायदा आमच्याच बापाचा आहे असे समजून घडलेल्या घटनेवर पांघरुण घालून खऱ्याच खोट व खोट्याच खर करत असल्याने तसेच काही ठिकाणी घडलेल्या गुन्ह्यातील आरोपींना वाचवण्यासाठी राजकीय हस्तक्षेप केला जात असल्याने इमानेइतबारे काम करणारे अधिकारी व कर्मचारी हतबल झाले असल्याने महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून तक्रार करुनही न्याय मिळत नसल्याने बऱ्याचशा महिला होणाऱ्या अन्यायाविरुद्ध बोलत नाहीत व सरतेशेवटी आत्महत्या करतात असे स्पष्ट मत काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.
अशीच एक घटना पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे घडली असून या घटनेमध्ये वरखेडी येथील एका २७ वर्षीय विवाहितेने एका खासगी फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या जाचाला कंटाळून विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी उघडकीस आली असून संबंधित महिलेने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये स्वताच्या आवाजात एक संदेश ध्वनी मुद्रित करुन संबंधित इसमाच्या नावाचा उल्लेख करुन आत्महत्या केली असल्याची बाब उघडकीस आली असून या घटनेमुळे वरखेडी परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असून सौ. आरती पाटील हिच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की वरखेडी येथील सर्वसाधारण कुटुंबातील सौ. आरती समाधान पाटील या चाळीसगाव येथील सॅटीन क्रिडेट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत ॲसिस्टन ब्रॅच मॅनेजर या पदावर काम करत होत्या या कंपनीत काम करत असतांनाच या कार्यालयातील प्रिन्स कुमार, कपिल वाडपत्रे व आकाश कुऱ्हेकर हे त्रिकूट मयत सौ. आरतीच्या सौदर्यावर टक लावून बसले होते.
(मयत आरतीने उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्याकडे दिलेला तक्रारी अर्ज)
याच कार्यालयात सौ. आरती कामा करत असतांना हे त्रिकूट आरतीला संबोधून वाइट हेतूने बोलत होते. यापैकी आकाश कुऱ्हेकर याने आरतीला विश्वासात घेऊन भोळ्याभाबड्या स्वभावाचा घेत तीच्या सोबत विश्वासघात करुन नको ते कृत्य केले ही घटना घडल्यानंतर आरती हैराण झाली व “सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही” या पेचात आरती सापडली कारण पतीला सांगितले तर पुढे काय होईल व समाजात बदनामी होईल म्हणून आरतीने कुठेही वाच्यता केली नाही.
म्हणून आरती चुप बसल्यावर आकाश कुऱ्हेकर याची हिंमत वाढली व तो तीला ब्लॅकमेल करुन वारंवार शरीर सुखासाठी मागणी करत होता व त्याचे दोन मित्र प्रिन्स कुमार व कपिल वाडपत्रे यांनीही आरती सोबत गैरवर्तन केले होते. आरती इच्छा पूर्ण करत नसल्याने संबंधित त्रिकूटाने तिला कामावरुन काढून टाकले होते. यामागील कारण म्हणजे आरतीला कामावरुन काढून टाकले म्हणजे आरती आपल्याला शरण येईल असा वाईट हेतू आकाश कुऱ्हेकर याचा होता परंतु आरतीला ते मान्य नव्हते.
आरतीची नकारात्मक भूमिका पाहून आपला हेतू साध्य करण्यासाठी आकाश कुऱ्हेकर याने प्रिन्स कुमार याला हाताशी धरुन आरतीला कामावरुन काढून टाकले होते. आरतीला कामावरुन काढून टाकल्यावर आपली फसवणूक झाल्याचे आरतीच्या लक्षात येताच आरतीने दिनांक २७ जानेवारी २०२५ सोमवारी रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे घडलेल्या प्रकार कथन करुन तसा तक्रारी अर्ज दाखल केला होता.
ही बाब आकाश कुऱ्हेकर याला माहीत झाल्यावर त्याने आरती सोबत केलेल्या गैरकृत्याचे मित्राच्या मदतीने काढलेले काही फोटो व चित्रफिती आरतीच्या मोबाईल पाठवून तु जर माझ्याविरुद्ध तक्रार दाखल केली तर मी हे फोटो सोशल मिडियावर टाकून तुला बदनाम करुन सोडेल व तुला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही व तुझ्या सासरचे ही तुला हाकलून देतील अशी धमकी दिली होती. या हा आकाश कुऱ्हेकर याच्या धमकीला घाबरुन आरतीने उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव यांच्याकडे दिलेला अर्ज मागे घेतला होता अशी माहिती समोर येत आहे.
आरतीला सॅटीन क्रिडेट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत ॲसिस्टन ब्रॅच मॅनेजर या पदावरुन हाकलून लावले असले तरी आकाश कुऱ्हेकर व त्याच्यासोबत प्रिन्स कुमार व कपिल वाडपत्रे वेगवेगळ्या मार्गाने आरतीचा छळ करत होते व या छळाला कंटाळून आरतीने टोकाचा निर्णय घेतला व काल दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ बुधवार रोजी घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात पी. जे. रेल्वे लाईन जवळ असलेल्या स्वताच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी म्हणजे दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ गुरुवार रोजी सकाळी उघडकीस आली आहे.
ही बाब घटना उघडकीस येताच वरखेडीचे पोलीस पाटील बाळू कुमावत यांनी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी घटनास्थळी येऊन मयत आरतीचा मृतदेह विहिरीतून काढून उत्तरिय तपासणीसाठी पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रकाश काळे व त्यांचे सहकारी करत आहेत.