पोवाडा गायक समाजभूषण शाहीर श्री. शिवाजीराव पाटील यांच्या आयुष्याचाच झाला पोवाडा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१/६/२०२३
पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील पोवाडा गायक समाजभूषण शाहीर मा. श्री. शिवाजीराव पाटील यांनी आयुष्यभर आपल्या शैलीत आपल्या शाहिरीने स्वरचित जनजागृतीसाठी तसेच थोर राजे, महाराजे, राष्ट्रपुरुषांच्या आयुष्यावर तसेच समाजप्रबोधन करण्यासाठी समाजातील वाईट रुढी, परंपरा, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यातुन समाजाची सुटका व्हावी म्हणून पोवाडे, लोकगीतांची स्वलिखित रचना करुन आपल्या भारदस्त आवाजात व स्वताच डफावर थाप मारुन भारदस्त आवाजात व शैलीत निर्भीडपणे जनतेसमोर मांडून समाजाला जागे करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले अश्या समाजभूषण शाहिर, पोवाडा गायक मा. श्री. शिवाजीराव पाटील यांच्याच आयुष्याचा पोवाडा झाल्याचा प्रसंग आज त्यांच्यावर ओढवला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवासी खान्देश लोकरंगचे फाउंडेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र शाहीर ज्यांनी मागील चार दशकांहून अधिक काळ आपल्या लेखणीतून व विहिरीतून जनहितार्थ पोवाडे लिहून आपल्याच भारदस्त आवाजात व मनगटातील कलेवर आधारित डफावर थाप देऊन जनजागृती केली व जनहितार्थ आपल आयुष्य खर्ची घातल असे समाजभूषण शाहीर मा. श्री. शिवाजीराव पाटील. यांचा सन २०२१ निसर्गाने घात केला व अतिवृष्टीमुळे त्यांचे घर पावसाने हिरावून घेतले. वडिलोपार्जित मातीच्या धाब्याचे घर असल्याने अतिवृष्टीमुळे ते पडले व ते बेघर झाले होते.
ही घटना माहीत पडताच कलेच्या कदरदान लोकांनी व महाराष्ट्रातील काही कलावंतांनी फुल नव्हे तर फुलाच्या पाकळीच्या स्वरुपात मदत मा. श्री. शिवाजीराव पाटील यांना मदतीचा हात दिला. तसेच पाचोरा तालुक्याचे आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांनी शाहीर शिवाजीराव पाटलांची भेट घेऊन पाचोरा तालुक्यातील स्थानिक कलावंत या नात्याने स्वताहून मनापासून मदत दिली होती. तसेच आमदार मा. श्री. मंगेशजी चव्हाण व आमदार मा. श्री. राजू मामा भोळे यांच्या व्यतिरिक्त स्थानिक लोकप्रतिनिधींनी व जिल्हा प्रशासनाने शाहिरांकडे कमालीचे दुर्लक्ष केले याची खंत शिवाजीराव पाटील यांनी सत्यजित न्यूज कडे बोलुन दाखवली.
पुढे बोलतांना शाहिरांनी सांगितले की २०२१ मध्ये जेव्हा अतिवृष्टीमुळे माझे घर पडले त्यावेळी तात्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. उध्दव ठाकरे साहेब व तात्कालीन सांस्कृतिक मंत्री मा. श्री. अमित देशमुख यांनी मदतीचे ठोस आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेल्या आश्वासनामुळे मी निचींत झालो होतो. आज ना उद्या आपल्याला मंत्रीमहोदयांकडून मदत मिळेल व आपल घर पुन्हा उभे राहिल या उमेदीने मी दिवस काढत होतो परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनाकडे त्यांनी पाठ फिरवली व माझे घर सावरण्याचे स्वप्न हवेतच विरले.
तरीही मी हिंमत न सोडता मुंबईत मंत्रालयात जाऊन थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथराव शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव मा. श्री. विकासजी खरगे यांच्याकडे आर्थिक मदतीसाठी प्रस्थाव दिला व मला आतातरी नक्कीच मदत मिळेल व मी पुन्हा घर उभ करु शकेल अश्या आशेवर होतो परंतु त्यांच्याकडूनही आश्वासना खेरीज काहीच मिळाले नाही.
आशा खुप वाईट असते एका बाजूला पडके घर व दुसरीकडे स्वप्नांचा बंगला डोळ्यात घेऊन मी पुन्हा सांस्कृतिक मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन मदतीची मागणी केली. तेव्हा मा. श्री. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी शाहीर शिवाजीराव पाटील यांना नवीन घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्यात यावी याकरिता जिल्हाधिकारी जळगाव यांच्या नावाने पत्र लिहून दिले तात्कालीन प्रभारी जिल्हाधिकारी मा. श्री. प्रवीण महाजन यांच्याशी थेट दुरध्वनी वर संपर्क साधुन त्वरित मदत करण्याचे सांगितले.
हातात पत्र मिळाल्यावर शाहिरांच्या अंगात नवीन ऊर्जा आली व त्यांना मिळालेले पत्र घेऊन जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात दिले तरीही काम होत नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन, तीन चक्कर मारल्यानंतर ते पत्र पाचोरा तहसीलदार कार्यालयात आले. आता आपल्याला मदत मिळेलच या आशेने शाहीर तहसीलदार यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेले असता अशी मदतीची तरतूद किंवा निधी आमच्याकडे उपलब्ध नसल्याने आम्ही आपली मदत करु शकत नाही असे उत्तर मिळाले हे उत्तर ऐकून शाहीर शिवाजीराव पाटील यांनी शासन व प्रशासनाच्या मनमानी, ढिसाळ कारभाराबाबत व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत नाराजी व्यक्त करत मागील कोरोनाच्या कालावधीत जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. गुलाबराव पाटील यांनी रघुवीर खेडकर यांना भरघोस मदत केली होती त्याबद्दल मा. श्री. गुलाबराव पाटलांबद्दल मनात आदरभाव निर्माण झाला होता. परंतु त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्थानिक कलावंतांच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष केल्याची खंत व्यक्त केली. तसेच जळगाव जिल्ह्यात दोन, दोन कॅबिनेट मंत्री असल्यावरही शाहीर पाटील यांना फक्त घरावर बसवण्यासाठी पत्रे दिली मात्र घराच्या भिंतीच नसल्याने ही पत्रे निरुपयोगी ठरत आहेत.
ते आज नगरदेवळा गावात भाड्याच्या घरात राहत असून आज त्यांचे वय सत्तरीच्या उंबरठ्यावर आहे. शाहीरांची दयनीय अवस्था पाहून गावातीलच एका कलावंतांना शिवाजीराव पाटील यांना अत्यल्प दरात आठशे स्क्वेअर फूट जागा उपलब्ध करुन दिली आहे मात्र या महागाईच्या काळात ही जागा बांधणे माझ्या आवाक्याबाहेर असल्याचे सांगत जेव्हा, जेव्हा लोखप्रतिनिधींना शाहीर शिवाजीराव पाटलांची गरज भासली तेव्हा, तेव्हा त्यांनी घरापर्यंत गाड्या पाठवून माझ्या कलेचा सोयीनुसार वापर करुन घेतला. आजही बरेचसे मंत्री, पुढारी काम पडल्यावर मला फोन करतात परंतु शाहीर शिवाजीराव पाटील कुठे रहातो, कसा रहातो याबद्दल कुणीही विचारत नसल्याने मी ज्यांच्यासाठी माझ्या शाहिरीने डफावर थाप मारुन भल्याभल्यांना प्रसिद्ध मिळवून दिली त्यांनीच माझ्याकडे पाठ फिरवल्यामुळे आता माझ्याच आयुष्याचा पोवाडा झाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.