जगा आणि जगू द्या विकास मंचच्या वतीने उद्यापासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना गाव बंदी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/०४/२०२३
शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्रात प्रथमच अभूतपूर्व अशी कापूस कोंडी निर्माण झाली आहे. त्यातल्या, त्यात आपल्या शासनाने सन २०२२ ते २०२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यात २००% कापूस आयात करतांना ११% आयात शुल्क माफ केले आहे. यामुळे जास्तीत, जास्त कापूस आयात केला गेल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांगल्या प्रतीच्या कापसाची मातीमोल भावाने खरेदी केली जात आहे.
याकरिता कष्टकरी शेतकऱ्यांच्या कापसाला सद्यस्थितीत कापूस उत्पादन करण्यासाठी होणारा खर्च व वाढती महागाई लक्षात घेता कापसाला प्रतिक्विंटल १२,३००/०० रुपये हमीभाव किंवा निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीपोटी एकरी २५०००/०० अनुदान जाहीर करुन प्रत्येक शेतकऱ्याला किमान तीन हेक्टर पर्यंत त्वरित अनुदान जाहीर करण्यात यावे असे न केल्यास विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही जगा आणि जगू द्या विकास मंचच्या माध्यमातून सत्ताधारी लोकप्रतिनिधींना गाव बंदी करणार असल्याचे जाहीर केले आहे.
या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे पाचोरा, भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ उद्या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार व ठिकठिकानचे सत्ताधारी आमदार हे पाचोरा येथील मोंढाळा रोड परिसरातील तुळजाई जिनींग येथे उद्या येणार आहेत. ही नामी संधी साधून सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी व कापूस कोंडी उठवण्यासाठी उद्या दिनांक २६ एप्रिल २०२३ बुधवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता वरखेडी नाक्याजवळ थांबून सत्ताधारी खासदार व आमदारांना जाब विचारुन गाव बंदी करण्यात येणार आहे. तरी सकाळी साडेनऊ वाजता जास्तीत, जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जगा आणि जगू द्या विकास मंचच्या माध्यमातून जगा आणि जगू द्या विकास मंचचे अध्यक्ष मा. श्री. निळकंठ पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. गुलाबराव पाटील, सचिव मा. श्री. कृष्णा वानखेडे यांनी केले आहे.