कापसाला तेरा हजार रुपये भाव द्यावा, यासाठी भडगाव येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०४/२०२३
भडगाव येथील पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते मा. श्री. सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच भडगाव तालुकाध्यक्ष मा. श्री. अभिमान राघो हाटकर व भडगाव तालुका कार्यकारणीच्या माध्यमातून कापसाला तेरा हजार रुपये भाव मिळावा तसेच दरवर्षाला किमान पंधरा टक्के वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलनात करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या जीवावरती राजकारण करून आमदार खासदार झालेले लोकप्रतिनिधी या सर्वांच्या संगणमताने व शासनाच्या चुकीच्या धोरणाच्या मुळे कापसाचे भाव पाडण्यात आले. आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे ही खेदजनक बाबा असून जे आमदार खासदार विधिमंडळात जाऊन मतदारसंघाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम करतात परंतु ते असं न करता शेतकऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे पिक ज्याला पांढरे सोने म्हणून ओळखले जाते त्या कापसाला प्रति क्विंटल तेरा हजार रूपये हमी भाव असूनही यावर आमदार साहेब एक शब्द सुध्दा विधिमंडळात काढत नाही ही खेदाची बाब आहे.
म्हणून आम्हा शेतकऱ्यांना वाटते की आमचे आमदार मुंबईला गोट्या, गोट्या खेळायला जातात काय ? असा प्रश्न उपस्थित होतो. अशा लोकप्रतिनिधींना महाराष्ट्रातील शेतकरी संघटनाच्या माध्यमातून त्यांना त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असे मत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी भडगाव येथे रस्ता रोको आंदोलनात व्यक्त केले.
यासंदर्भात भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन राघो हाटकर यांनी शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे गंभीरपणे पाहिले जात नसल्याने आम्ही आता यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करू असे यावेळी जाहीर केले कारण वडली गावात एक शेतकरी कुटुंबातील परिवार सततच्या नापिकीला कंटाळून व पिकवलेल्या शेतमालाला भाव मिळत नसल्याने सामूहिक आत्महत्या करतो ही खेदाची बाब आहे असे मत तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील यांनी व्यक्त केले.
या भडगाव येथील रस्ता रोको आंदोलनात तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी, संपर्कप्रमुख भगवान चौधरी, माहिती प्रमुख विलास वासुदेव देशमुख खजिनदार मनोज परदेशी यासह तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी, तालुक्यातील शाखांची संपूर्ण कार्यकारणी, तालुक्यातील शाखांची कार्यकारणी व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.