कापसाला योग्य भाव मिळावा म्हणून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर “जगा आणि जगू द्या” विकास मंचचे बेमुदत धरणे आंदोलन सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०३/४०२३
समाजातील गरीब, गरजू व वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जगा आणि जगू द्या विकास मंच तर्फे केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच गरज नसतांना विदेशातून कापूस आयात केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांची एकप्रकारे कोंडी निर्माण झाली आहे यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने कापसाला योग्य भाव मिळावा तसेच इतर शेतीमालांना चांगला भाव मिळवा याकरिता विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवार साहेबराव करपे व त्यांच्या कुटुंबीयांना श्रध्दांजली अर्पण करून जगा आणि जगू द्या विकास मंचचे अध्यक्ष निळकंठ पाटील, उपाध्यक्ष गुलाबराव पाटील व सचिव कृष्णा वानखेडे यांनी दिनांक १९ मार्च २०२३ रविवार पासुन पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
हे आंदोलन सुरु झाल्यावर उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या जेष्ठ नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी, डि. एम. पाटील, डॉ. निळकंठ पाटील, रमेशजी बाफना, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण पाटील, अंबे वडगाव येथील संतोष पाटील, विठ्ठल दादा गुंजाळ, किशोर गरुड, दिलीप चव्हाण, प्रकाश चव्हाण, योगेश पाटील, नंदू पाटील, ज्ञानेश्वर तांबे , भरत पाटील, जयवंत पाटील, दशरथ पाटील, मनोज रविंद्र पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.