जनतेकडून सत्कारांचा पाऊस संपल्यानंतर आता खताळ साहेबांकडून कारवाईचा चमत्कार सुर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०३/२०२३
पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. श्री. नजन पाटील यांची बदली झाल्यानंतर काही महिने पाचोरा पोलीस स्टेशनचा कारभार प्रभारी अधिकारी मा. श्री. प्रताबराव इंगळे यांनी चांगल्याप्रकारे सांभाळला या काळात पाचोरा पोलीस स्टेशनला नवीन पोलीस निरीक्षक म्हणून मान श्री. राहुल खताळ यांची वर्णी लागणार असल्याचे भाकीत सत्यजित न्यूज कडून वर्तविण्यात आले होते.
हे भाकीत खरे ठरले व मागील आठवड्यात मा. श्री. राहुल खताळ साहेबांची पाचोरा पोलीस स्टेशनला नियुक्ती करण्यात आली. या. श्री. राहुल खताळ साहेबांनी पाचोरा पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर पाचोरा शहरासह पाचोरा पोलीस स्टेशनच्या कार्यकक्षेत येणाऱ्या गावागावांतील प्रतिष्ठित नागरिक, पदाधिकारी, पत्रकार व सर्वसामान्य जनतेकडून त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
आता दोन दिवसांपूर्वी सत्कारांचा ओघ कमी झाला असल्याचे दिसून येत असून आज मा. श्री. खताळ साहेबांनी उपनिरीक्षक मा. श्री. योगेश गगणे साहेब, मा. श्री. जितेंद्र वल्टे साहेब व आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत कारवाईची सुरुवात केली आहे. या कारवाईची सुरुवात पाचोरा शहरातील बेशिस्तपणे सुरु असलेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रथम सुरुवात करत जारगाव चौफुली, जळगाव चौफुली व अन्य रस्त्यावर थांबुन येणाऱ्या वाहनांची तपासणी करत वाहनांची आर. टी. ओ. विभागाची कागदपत्रे तपासून वाहन चालवण्याचा परवाना आहे किंवा नाही, वाहनांच्या फॅन्सी नंबर प्लेट, तसेच नंबर प्लेट नसलेल्या वाहनधारकांवर नियमांनुसार योग्य तो दंड आकारुन दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
“मा. श्री. खताळ खताळ साहेब”
पाचोरा शहरात तसेच पाचोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व वाहनधारकांनी वाहन चालवतांना आपल्या ताब्यात असलेल्या वाहनाची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अधिकृत कागदपत्रे तसेच वाहन चालवण्यासाठीचा परवाना (लायसन्स) सोबत बाळगावे तसेच वाहनांवरील वेगवेगळ्या डिझाईन किंवा फॅन्सी नंबर प्लेट अपेक्षित नसून पांढऱ्या रंगाच्या पट्टीवर काळ्या रंगात नंबर असलेली नंबर प्लेट अपेक्षित आहे. तसेच अल्पवयीन मुले वाहन चालवतांना आढळून आल्यास त्यांना कारवाईला सामोरे जावे लागेल अशी सुचना करत सर्व वाहनधारकांनी कायद्याचे पालन करुन पाचोरा पोलीसांना सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
म्हणून जनतेकडून सत्कारांचा पाऊस संपल्यानंतर आता खताळ साहेबांकडून कारवाईचा चमत्कार सुर झाला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.