कापसाचा भाव वाढविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल संघटनेचा पहिल्या वर्धापन दिनानिमित्त निर्धार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/०२/२०२३

अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त व महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या प्रथम हिंदवी स्वराज्याचे स्वराज्य प्रमुख श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात येऊन वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १९ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या जयंती दिवशी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. आणि त्या माध्यमाने आज एका वर्षामध्ये संघटनेने गाव तेथे शाखा उघडून पिक विम्याचे प्रश्न, पाट चाऱ्यांचे प्रश्न, सिंचन प्रकल्पांचे प्रश्न, कृषी विभागाचे प्रश्न, त्यासोबत शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्रात संघटना जोमाने काम करीत आहे.

त्यात संघटनेने प्रामुख्याने पारोळा, धरणगाव, एरंडोल, भडगाव या तालुक्यांमध्ये संघटनेने गाव ते शाखा अभियान राबवून शाखा स्थापन करून शेतकऱ्यांना एकत्र करून न्याय देण्याचे काम सुरु केले आहे. हे काम पाहून आपल्या जळगाव जिल्हाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रील धुळे, वर्धा, नाशिक, नगर, संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या विचारांना शेतकरी जुळत चालले आहेत हे आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी उत्तर महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

म्हणून शेतकरी जोपर्यंत सक्षम होत नाही तोपर्यंत संघटना रात्रंदिवस काम करेल अशी जिद्द, चिकाटी घेऊन आपल्या देशात कापसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झालेले असून देखील शासनाने चुकीचे धोरण अवलंबून बाहेर देशातून कापसाची आयात केल्यामुळे कापसाचे भाव पडलेत म्हणण्यापेक्षा पाडण्यात आले असे म्हणावे लागेल त्यामुळे मागील वर्षी चौदा ते पंधरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव असल्यावर देखील या वर्षाला फक्त आणि फक्त आठ हजारापर्यंत भाव जात आहे. उत्पादन खर्चाचा विचार केला असता कापूस परवडण्यासारखा राहिलेला नाही.

शासनाने ही जुलमी पद्धत वापरून शेतकऱ्यांना आर्थिक मानसिक त्रास देण्याचे ठरवलेले दिसते म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटना आठ ते दहा दिवसाच्या आत कापूस भाव वाढी संदर्भात अति तीव्र आंदोलन करेल आज या वर्धापन दिवस दिनाच्या दिवशी सांगावसं वाटतं याव्यतिरिक्त पिक विमा संदर्भात शासन दिशाभूल करतांना दिसत आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर तोडकी नुकसान भरपाई देऊन शेतकर्यांना फसवण्याचे कटकारस्थान कंपनी आणि शासन करतांना दिसत आहे. याव्यतिरिक्त संघटनेच्या विविध मागण्यांसंदर्भात संघटना रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा निर्धार आज वर्धापन दिना दिवशी करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब पाटील यांनी सांगितले की, शेतकरी हिताचे काम करणाऱ्यांना दिर्घ आयुष्य लाभो व शेतकरी संघटीत करून त्यांना आर्थिक, सामाजिक, सक्षम करो असे सांगितले. यावेळी पारोळ्यातील सर्व ज्येष्ठ, श्रेष्ठ पत्रकारांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या धरणगाव तालुका अध्यक्षपदी संजय सिताराम चव्हाण, कार्याध्यक्षपदी प्रदीप एकनाथ चव्हाण व युवा अध्यक्षपदी सुबोध सिताराम खैरनार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

पारोळा तालुका सचिव म्हणून ईश्वर दारासिंग मोरे गोंडगाव गणप्रमुख म्हणून रोहिदास रतन माळी यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून संघटनेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ कल्याणी देवरे, सर्व पत्रकार बांधव, संघटनेचे प्रवक्ते सुभाष पवार, भडगाव चे तालुका अध्यक्ष अभिमन हाटकर,जळगाव जिल्हा सचिव आनंदराव पाटील, पारोळा तालुकाध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, प्रिया गुजर, स्वेता पाटील, स्वाती महाजन, योगिता पाटील, सपना पाटील, मोहिणी पाटील, भडगाव तालुका कार्यकारणी, पारोळा तालुका कार्यकारणी, शाखा कार्यकारिणी पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद चौधरी यांनी केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, शेतकरी शेतकरी उपस्थित होते.