पांढऱ्या सोन्याला मातीमोल भाव, खोके घेऊन बोके करत आहेत डराव, डराव. शिवसेना जिल्हाप्रमुख दिपक राजपूत.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०२/२०२३
सद्यस्थितीत शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला योग्य भाव नाही. तसेच सोयाबीन, तुर, सुर्यफुल मातीमोल भावाने खरेदी केले जात आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला कापसाला प्रतिक्विंटल १००००/०० रुपये व सोयाबीन, तुर, सुर्यफुलाला प्रतिक्विंटल आठ ते नऊ हजार रुपये भाव मिळणे अपेक्षित होते परंतु यावर्षी भारतीय जनता पार्टी व खोके घेऊन पसार झालेल्या आमदारांनी एकत्र येऊन सत्ता बळकावल्या पासून महाराष्ट्रात फक्त हमशाही पद्धतीने राज्यकारभार सुरु असून जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळत नसल्यामुळे आम्हाला आंदोलन करावी लागत आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाचे व खोके घेऊन पसार झालेले सत्तेतील आमदार कुंभकर्ण झोपेत आहेत की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच एका बाजूला शेतकरी अडचणीत सापडलेला असतांनाच दुसरीकडे महाराष्ट्र सरकार मोठमोठे मेळाव्यांचे आयोजन करुन कुबेराचा खजिना समजून पैसा खर्च करत एकप्रकारे शक्ती प्रदर्शन करत आहे असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत यांनी दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी शिवसेना व युवासेनेच्या वतीने पुकारलेल्या एकदिवसीय धरणे आंदोनस्थळी जामनेर तहसील कार्यालयासमोर व्यक्त केले.
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत शेतकऱ्यांनी घाम गाळून कापूस व इतर पीकांचे उत्पन्न काढले परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेकरी पोरका झाला आहे. केंद्र सरकारने गरज नसतांना बाहेरच्या देशातून कापूस आयात केल्याने कारखानदारांची गरज भागली व मागणी घटली, तसेच खेडा खरेदी, वायदे बाजार व हमीभाव जाहीर न केल्यामुळे भांडवलदारांनी एकजूट करत कापसाची अंत्यत कमी भावात खरेदी सुरु केले सोबतच तुर, सुर्यफुल, सोयाबीन या पिकांचे भाव गडगडले व शेतकऱ्यांनी केलेला खर्चही हाती येत नसल्याचे पाहून शेतकरी अधिक कर्जबाजारी झाला आहे.
म्हणून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनात उतरली आहे. काल दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ गुरुवार रोजी शिवसेना व युवासेनेच्या वतीने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. दिपक भाऊ राजपूत व शिवसेनेचे जामनेर तालुकाप्रमुख ॲड. ज्ञानेश्वर दादा बोरसे यांच्या उपस्थितीत जामनेर तहसील कार्यालयासमोर सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत एक दिवसीय धरणे आंदोलन करत कापसाला प्रतिक्विंटल १००००/०० रुपये व सोयाबीन, तुर, सुर्यफुल या पिकाला प्रतिक्विंटल ८०००/०० रुपये भाव मिळाला पाहिजे, पोखरा योजना लागु करण्यात यावी, शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विम्याच्या माध्यमातून सरसकट नुकसान भरपाई द्यावी, दिवसा आठ तास अखंडितपणे वीजपुरवठा मिळावा म्हणून जोरदार घोषणाबाजी करत एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येऊन आपल्या मागण्यांचे निवेदन जामनेरचे तहसीलदार मा. श्री. अरुण शेवाळे साहेबांना देण्यात आले.
या एकदिवसीय धरणे आंदोनस्थळी शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख मा. श्री. अरुण भाऊ पाटिल पाचोरा शेतकरीसेनेचे तालुकाप्रमुख मा. श्री. रमेशचंद्रजी बाफना, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मा. श्री. दिलीप भाऊ राजपूत, तालुकाप्रमुख ॲड. प्रकाश पाटील, माजी तालुकाप्रमुख मा. श्री. सांडु मामा गुरव, मा. श्री. दिलीप श्रीपत पाटील, उप तालुकाप्रमुख मा. श्री. सुधाकर सराफ. मा. श्री. व्ही. पी. पाटिल सर, युवासेनेचे उपजिल्हाधिकारी राहुल चव्हाण, युवासेनेचे तालुकाधिकारी मा. श्री. नरू भाऊ धुमाळ, संघटक विष्णू सोनवणे. उप तालुकाप्रमुख कृष्णा चोरमारे, गणेश पांढरे, पहूर शहरप्रमुख संजय तायडे, शेंदुर्णी शहरप्रमुख संजय सुर्यवंशी. जामनेर शहरप्रमुख नाना जंजाळ, शहरप्रमुख पवन माळी, विलास पाटील, मायकल, देवाभाऊ, इसाम मामू, गोपाल तेली, ज्येष्ठ शिवसैनिक श्यामराव बाबा पाटील, गणेश पाटिल, काशिनाथ शिंदे, सूपडू माळी, मानोज मिस्तरी, संजु भाऊ पाटिल, शिवाजी पाटिल, विनोद सोनवणे, कूंदन भदाने, भैय्या कुमावात, तुकाराम गोपाल व युवासेना तालुकाधिकारु मयुर पाटिल, विशाल लामखेडे, युवा शहरप्रमुख विशाल भोई सह असंख्य शिवसैनिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने हजर होते.
“एकदिवसीय धरणे आंदोनस्थळी जुन्या आठवणींना उजाळा”
काल रोजी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र व राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा पंचनामा करण्यात आला. या एकदिवसीय धरणे आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेनेचा जोश व ऐकता पाहून जामनेर तालुक्यातील १९८९ साली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असाच जोश होता व आता पुन्हा शिवसेनेत पुन्हा नवचैतन्याची लाट उसळली असल्याचे मत माजी शिवसैनिकांनी बोलून दाखवले.